मन की बात

#मनकीबात
©️ अंजली मीनानाथ धस्के
टेक केअर गूड नाईट या सिनेमाच्या निमित्ताने.........
          हा सिनेमा बघितला तेव्हापासून या बद्दल लिहावं म्हणत होते पण या ना त्या निमित्ताने लांबणीवर पडत गेलं...... काल परवाच मैत्रिणीशी बोलतांना काही विषय निघाले आणि आता लिहावच असं मनाने घेतल.....
कलाकार उत्तम असतील तर सादरीकरण उत्तम होतंच पण त्या आधी सिनेमाचा प्राण म्हणजे त्याचे कथानक उत्तम हवे . या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तरच उत्कृष्ट सिनेमा बनतो.
 मला जे अनुभवाने पटले... नेमक तेच या सिनेमाने अधोरेखित केले आहे , " जेव्हा करायला काहीच नसत तेव्हा अनेक चुकीच्या गोष्टी आपल्याच नकळत आपल्या आयुष्यात प्रवेश करतात". म्हणून हा सिनेमा मला खूप भावला..... असो
*सगळ्यात आधी पालकत्व कसे असावे ? कसे असू नये यासाठी  हा सिनेमा मार्गदर्शक आहे. आदर्श पालक होण्याचे नेमके असे कुठलेच ठोकताळे नाहीत . फक्त येणाऱ्या चांगल्या वाईट परिस्थितीत मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असते आणि तेच आपल्याला उत्तम पालक बनवते.
*आपल्या मुलांना चांगली संगत असणे गरजेचे आहे.
*बदलत्या काळाची गरज म्हणून येणारे नव नवीन ज्ञान आपण आत्मसात करायलाच हवे त्यासाठी इतरांवर अवलंबून राहता कामा नये.
*स्वतः बद्दलच्या खासगी बाबी फोन वर बोलतांना मोठ्याने बोलू नये.
*मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्यातला संवाद कमी होता कामा नये.
*आपल्याला काय वाटत ... या पेक्षा मुलांना काय वाटतं... हे वेळोवेळी तपासल पाहिजे.
*अनोळखी व्यक्तीशी मैत्री करतांना नेहमी सजग राहावे.
*मुलांना (मोठ्यांना ही) ..... करण्यासारखं खूप काही असलं पाहिजे.( इथे ढीग भर क्लासेस लावून त्यांचे बालपण गमावणे मुळीच अपेक्षित नाही. त्यांच्यातल्या रचनात्मकतेला चालना मिळत रहावी.... एवढेच)
*चूक कुठल्याही प्रकारची असो ती कबुल करण्याची आणि ती चूक सुधारण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांची तयारी असली पाहिजे.
*समस्येला घाबरून जीव देण्यापेक्षा..... शेवटच्या श्वासापर्यंत लढणेच अधिक योग्य आहे.
**आता सगळ्यात महत्वाचं....
"खरं सांगू... मला करण्यासारखं काहीच नव्हतं म्हणून मी चॅटिंग करत होती " ..... या आशयाचा  फार छोटा डायलॉग आहे त्यात पण खूप .... खूप गंभीर समज देवुन जातो.
अनेकदा आपण पाहतो वाचतो , " माझ्याही काही गरजा आहेत " असं म्हणून अनेक लोक फावल्या वेळेत गैर गोष्टींच्या आहारी जातात ... स्वतःची  चूक झाकण्याचा प्रयत्न करतात ....
खरं पाहिलं तर स्वतःच्या अशा गरजा कोणाला नसतात ..... एक सारख्याच परिस्थितीत चांगलं आणि वाईट वागणारे असतातच की.... चिखलात कमळ आणि शेवाळे दोन्ही उगवते ... आपल्याला नेमके काय व्हायचे आहे ते सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे.
आता प्रश्न पडेलच.... की, "कमळ होण्यासाठी काय करावं?"  तर त्याच अगदी साध उत्तर आहे , " आयुष्याच ध्येय निश्चित करावं" . ज्याला करण्यासारखं खूप काही असतं तो वाईट गोष्टींच्या आहारी साहजासहजी जात नाही. तुम्हाला छंद असले पाहिजेत ... तुम्ही ते जोपासले पाहिजेत.... मग तुम्ही नोकरी करत आहात ....कींवा .... करत नाही याला काहीच महत्त्व नाही . " खाली दिमाग ... शैतान का घर " ही म्हण उगाच नाही पडली.
स्वतःला चांगल्या कामात व्यस्त ठेवले तर वाईट सवयींच्या आहारी जायला वेळ रहात नाही.  लहान मूल जेव्हा पाळण्यात असते तेव्हा त्याच्याकडे काहीच नसते करायला मग ते काय करते , पाळण्यात झोपल्या झोपल्या आपल्याच हातांचे  .... मागून... पुढून निरिक्षण करत बसते ....... बोटांच्या मुठी आवळून..... पुन्हा त्या उघडून पाहते.... त्यांना पाहून हुंकार भरते . जेव्हा ते पालथे पडते ... रांगायला लागते तेव्हा त्याला नविन विश्वाची ओळख होते ... करण्यासारखे खूप काही मिळते आणि मग पळण्यातला  हातांचा खेळ विस्मरणात जातो. आपलंही अगदी असंच असतं ..... करायला काहीच नसेल तर आपल्या शारिरीक गरजा .... मानसिक गरजा डोकं वर काढतात आणि त्या सहजा सहजी पूर्ण होत नसतील तर मग  आपण चुकीच्या मार्गाने वाटचाल सुरु करतो. काही जण रिकामा वेळ असेल तेव्हा तासन् तास गॉसिपिंग करून  आपल्याच डोक्यात कचरा भरून घेतात तर काही जण तासन् तास व्हिडिओ गेम खेळत बसतात.  काही जण मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी गरज नसतांना सतत शॉपिंग करत असतात तर "शारिरीक गरज " या  नावाखाली अनेक स्त्री पुरुष आपल्या चुका झाकण्याचा प्रयत्न करतात. मूळ समस्या काय आहे ? याच्या खोलात न शिरता वरवरचा विचार करून झडपट समाधान देणारे उपाय अवलंबले जातात.
मदत तेरेसा ...... डॉ. अब्दुल कलाम ... यांचे मानवी देह नव्हते???? की.... यांना मानसिक, शारिरीक गरजा नव्हत्या???? शरीर धर्म कोणाला चुकला आहे  .... तसाच तो त्यांनाही चुकला नसेल. पण त्यांनी त्यांच्या गरजांचे भांडवल केले नाही कारण....... कारण ..... या गरजा आयुष्यभर कुरवाळत बसण्यापेक्षा त्यांनी आयुष्याचे उदात्त ध्येय ठरवले आणि ते गाठण्याचा मार्ग अवलंबला.
मान्य आहे सगळ्यांनाच काही मदर तेरेसा आणि डॉ. अब्दुल कलाम होण शक्य नाही  .....  म्हणूनच आपले थोर संत सांगुनच गेले आहेत, " सामान्यांनी धोपट मार्ग सोडू नये.... संसारात राहून परमार्थ साधवा ".
तेव्हा आपण जे करतो आहोत तेच करत राहायचे ..... तरी वेळ उरत असेल तर त्यावेळेचा सदुपयोग करायचा ... छंद जोपासायचे.... नवनविन गोष्टी शिकत राहायचं ..... रचनात्मक दृष्टीने स्वतःचा विकास करत राहायचं.... असं केल्याने आयुष्यातील अनेक छोट्या छोट्या समस्या नक्कीच  नाहीश्या होतील.
खरं तर खूप सोपं आहे सगळं फक्त आपण आपल्या मनाला योग्य वळण लवायची गरज आहे.
( सिनेमा बघितल्यावर ..... मनात विचार सुरू झाले .... म्हणून डोळ्याची रांगोळी पोस्ट केली  )
©️ अंजली मीनानाथ धस्के

(टिप: हे सर्वस्वी माझे मत आहे .... तुमचे मत या पेक्षा वेगळे असू शकते. पटल्यास स्विकारावे अन्यथा इथेच सोडून द्यावे )

2 comments: