दिवाळी २०२४

 दिवाळी साठी खास पारंपारिक ठिपक्यांची रांगोळी काढली आहे. १६ ते १६ ठिपक्यांची ही रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल. 

त्याच बरोबर वसुबारस, धनत्रयोदशी आणि इतर काही झटपट काढता येणाऱ्या रांगोळ्यांची लिंक ही इथे देत आहे. या सगळ्याच रांगोळ्या कशा काढल्या हे पाहण्यासाठी लिंक वर जरूर क्लिक करा. 

वसुबारस विशेष रांगोळी 👇

https://youtu.be/2g7nMhXTusY?si=tah79HlbnUJamd91


धनत्रयोदशी विशेष रांगोळी 👇



झटपट होणाऱ्या छोटया रांगोळ्या 👇



१६ ते १६ ठिपक्यांची ही रांगोळी👇



दसरा २०२४

 दसरा निमित्त काढलेली पाटी, सरस्वती चिन्ह आणि आपट्याच्या पानाची सुरेख रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल. संपुर्ण रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा,👇👇👇

https://youtu.be/Lga8fQeZSd0?si=TWoawTbwTmcoe6_I






नवरात्र २०२४

 नवरात्र निमित्त काढलेली रांगोळी.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीची रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल. संपुर्ण रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇

https://youtu.be/QELuupzREvU?si=7oBwbqaQfKsyeDzI


झटपट काढता येणारी छोटी रांगोळी 👇👇👇

https://youtube.com/shorts/kr06V4OUKao?si=LlhHGqOQ6F4DGnW2





छोटी रांगोळी 





गणेश चतुर्थी २०२४

 गणेश चतुर्थी २०२४

निमीत्त काढलेली गणपती बाप्पाची बाल रूपातील सुरेख रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल.

गणेश चतुर्थी च्या तुम्हा सगळ्यांना आभाळभर शुभेच्छा 

 रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/prGuXrJBBJc?si=ZDs7M6qSBIbPWqkJ



आषाढी एकादशी २०२४

 #आषाढीएकादशी २०२४

अगदी साधी वाटणारी परंतू मनाला भक्तिरसात न्हाऊन काढणारी ही रांगोळी तुम्हालाही नक्की आवडेल.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇

https://youtu.be/RuV-mPSQOkQ?si=tPbcCabmnApBp7ib



चौकट (मातृ दिना निमीत्त केलेली कविता)

#Mothersday2024 #mothersdayspecial 

#कविता 

#चौकट

आई आणि.......... बरेच काही 

चौकटीत राहणाऱ्या आणि चौकट मोडू पाहणाऱ्या सगळ्याच मातांना ' मातृ दिनाच्या' हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

@anjalimdhaske

बाप होता येतं सहजच 

आईने नऊ महिने गर्भ रखावा लागतं 


बाप असू शकतो स्वार्थी 

आईने निःस्वार्थ असावं लागतं 


बाप असतोच कठोर 

आईने हळवं रहावं लागतं 


बाप असला जरी स्वच्छंदी 

आईने घराशी, लेकरांशी बांधून घ्यावं लागतं


बापाला असते मुभा बेफिकरीची 

आईने मात्र जबाबदार असावं लागतं 


बापाला उपमा ' नारळाची '

आईने 'दुधावरीची साय ' व्हावं लागतं



बापाला व्यसनांचा आधार 

आईने निर्व्यसनी तरी खंबीर असावं लागतं 


बाप घरातला ' कमावता ' असतो 

आईने कमवूनही घरासाठी ' राबवं' लागतं 


बाप जरा.. बरा असला तरी ' भारी' वाटतो 

आईने नेहमीच ' भारी' असावं लागतं 


बाप करु शकतो ' उपेक्षा '

आईने मात्र सगळ्यांच्या अपेक्षांवर ' खरं ' उतरावं लागतं 


बापाला प्रिय असतं त्याचं स्वातंत्र्य

आईने मात्र कायम पारतंत्र्यात रहावं लागतं 


बापाला घेता येते विश्रांती 

आईने २४*७ ' ऑनड्युटी' रहावं लागतं 


बापाला असते स्वतःची ' चॉईस' 

आईने दुसऱ्यांच्या आवडीला ' आपलं' मानावं लागतं 


बापात कायम असतं ' पुरुषपण' 

आईने ' बाईपणाच ' मोल द्यावं लागतं


बाप कसाही असू शकतो 

आईने कायम ' आदर्श' असावं लागतं 


बाप  असतो घराचं छप्पर

आईने मात्र भिंत होवून 

त्याचही ओझ खांद्यावर घ्याव लागतं


बापाला 'माणूस ' म्हणून जगता येतं

आईने मात्र कायमच ' आई ' रहावं लागतं


बापा विषयी फार कोणी लिहीत नाही 

म्हणून त्याच्या वागण्याला नसते 'समाजाची चौकट ' 

आईने मात्र स्व अस्तित्व हरपून मातृ साहित्याच्या ओझ्याखाली ' सामाजिक  चौकटीतच ' जगावं लागतं

©️ अंजली मीनानाथ धस्के 






आयस्क्रिम मशीन

 #आयस्क्रिम_मशीन 

©️ अंजली मीनानाथ धस्के 

टाईम मशीन बद्दल आपण सगळ्यांनीच वाचले किँवा ऐकले असेल. टाईम मशीन या संकल्पने आधी 'आयस्क्रिम मशीन' या संकल्पनेशी माझे बालपण जोडल्या गेले आहे.  टाईम मशीनचा अनुभव घेणे तर शक्य नाही. टाईम मशीन असती तर पुन्हा एकदा पारंपरिक आयस्क्रिम मशीनचा अनुभव घेता आला असता का? माहित नाही परंतू आठवणीच्या गाठोड्यात असे अनेक क्षण टाईम मशीनच्या प्रतीक्षेत आहेत. 

       मी साधारण दुसरीत असेल.......

           एक दिवस संध्याकाळी खूप उत्साहात वडील घरी आले होते. त्यांना आम्हाला काही तरी सांगायचे होते परंतु उन्हाळ्याचे दिवस व शाळेला सुट्टी सुरू असल्याने संपूर्ण दिवस घरात बसून कंटाळलेली आम्ही भावंडे खेळायला बाहेर पडलो. रात्रीच्या जेवणाला बसलो तेव्हा  मात्र वडील आई यांचे 'आयस्क्रिम मशीन' या विषयावर बोलत सुरू झाले. मधेच आम्हाला उद्देशून वडील बोलले," मुलांनो या रविवारी आपण घरी आयस्क्रिम बनविणार आहोत."

आम्ही सगळ्यांनी अगदी आश्चर्याने," खरंच...... घरी आयसक्रिम बनविता येते?"

त्यावर वडील उत्साहाने ," का नाही.... आयस्क्रिम मशीनमधे सहज बनविता येते?"

आम्हीं खुशीत," आपण आयस्क्रिम मशीन घेणार आहोत?"

त्यावर आई ," दोन महिने उन्हाळा जाणवतो... त्यासाठी एवढे महाग मशिन घ्यायचे. बाकी वर्षभर त्याला सांभाळत बसावे लागेल ते वेगळेच"

वडिलांनाही कल्पना होती की,  असली हौस त्यांच्या खिषालाही परवडणारी नव्हती. तरीही आमच्या समोर ते बोलले ," एक दिवस वापरून बघू, आपल्याला आवडली तर आपली स्वतःची मशीन विकत घेवू.... त्यात काय एवढे"

आम्ही भावंडे," मग आपल्याला रोज आयस्क्रीम खायला मिळणार?"

वडील बोलले," आधी मशिन घरी येवू तर द्या "

            आमच्या घरी , आमच्या ओळखीत तसेच संपूर्ण कॉलनीत कुणाकडे तेव्हा फ्रीजही नव्हता. ' बर्फ' हा फक्त कुल्फी वाल्यांच्या लाल मडक्यात बघायला मिळायचा. आयसक्रिम हा शब्द या आधी आम्ही फक्त ऐकून होतो. त्याची चव कशी असेल याची कल्पनाच फक्त करु शकत होतो. तेच आयस्क्रिम आपल्या घरी बनणार आहे आणि त्याची चवही आपल्याला चाखायला मिळणार आहे याच उत्साहात आम्ही भावंडे झोपी गेलो.

    वडील ज्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. तिथल्याच एका सह प्राध्यापकाने हे आयस्क्रिम चे मशीन विकत घेतले होते. बोलता बोलता त्यांनी वडीलांजवळ त्या मशीनच्या आयस्क्रिम बद्दल फारच कौतुक केले. घरच्या घरी अगदी स्वस्तात खूप चविष्ट आयस्क्रिम बनविता येते. हे फार रंगवून रंगवून सांगितले होते. वडिलांनीही असे एक मशिन घ्यावे यासाठी त्यांनी खूप प्रेरित केले होते. त्या मशीनच्या वर्णनाने वडील फारच प्रभावित झाले होते. मशिनची किंमत चार ते पाच हजार रुपयांपर्यंत होती. तसेच इतर खर्च बघता आयस्क्रिम बनविणे वाटते तितके सोपे आणि स्वस्त नक्कीच नव्हते याचा अंदाज वडीलांना आला होता तरीही आपल्या मुलांना प्रत्यक्षात आयस्क्रिम कसे बनते? हे घरच्या घरी दाखविण्याची संधी त्यांना सोडायची नव्हती. त्या मशिनमधे आयस्क्रिम बनविण्याच्या प्रक्रियेने त्यांच्यावर अशी काही मोहिनी घातली होती की, वडिलांनी स्वत:च्या तत्त्वाला डावलून प्रथमच त्यांच्या  सहकाऱ्याला एक दिवसासाठी ते मशिन मागितले. 

        खरे तर वडीलांना उधार घेणे, दुसऱ्याची वस्तू  / कपडे आणून वापरणे असले काहीही अजिबात आवडत नसे.  तरीही त्यांनी ती मशिन एका दिवसासाठी मागितली होती. यावरून त्या मशिनमधे नक्कीच काहीतरी खास आहे याची कल्पना घरातील प्रत्येकाला आली होती.

       शनिवारी संध्याकाळी आमच्याकडे मशिन येणार, रविवारी आम्ही आयस्क्रिम बनविणार आणि सोमवारी सकाळी ती मशिन परत करायची असे काहिसे ठरले होते. प्रत्यक्षात आमच्या घरी मशिन येणारा शनिवार उगवायला जरा वेळ लागला. ज्यांची मशिन होती तेच प्रत्येक रविवारी आयस्क्रिम बनवत असल्याने आमच्या स्मरणातून ती मशिन गेली होती. त्यांनी मशिन स्वतःहून दिली तरच मशिन आणायची, त्यांना आपण मशिन मागायची नाही असेच आई बाबांनी नी जाहीर केले होते. मशिनची किंमत, उन्हाळा दिवस .... बघता आपण मशिन मागणे योग्य नाही असेच त्यांना वाटत होते.

 ज्यांची मशिन होती त्यांचे कुटुंब चार पाच दिवस गावी जाणार असल्याने त्यांनी स्वतःहून वडीलांना मशिन घेवून जाण्याविषयी सुचविले. तसेच काय काय तयारी करावी लागेल याची सविस्तर माहिती दिली. त्या एका शुक्रवारी वडील पुन्हा अतिशय उत्साहात घरी आले. घरी आल्या आल्या त्यांनी आईला रविवारी जास्तीचे दिड लिटर दूध मागवयला सांगितले. रसवंती गृहातून छोटी बर्फाची लादी आणावी असे मनात येवून वडिलांनी चौकशी केली असता ते प्रकरण बरेच खर्चिक जात होते. स्वस्तात बर्फाची लादी कूठे मिळते? कोण आणून देवू शकेल ? यावर आमच्या घरमालकासहित अनेकांशी चर्चा सुरू असतांनाच मला रोज शाळेत सोडणारे रिक्षावाले काका ' हरिभाऊ' गरजेला काही पैसे मिळतील का? असे विचारायला आले होते. आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना मात्र आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागायचे.  त्यांनी सगळी चर्चा ऐकली तेव्हा त्यांनीच सांगितले की ते चौकातल्या रसवंती साठी कधी कधी बर्फ आणून देतात. यात एक अडचण होती की बर्फाची एक लादीच घ्यावी लागणार होती. उरलेल्या लादीचे काय करायचे हा प्रश्न होता. परंतु या सगळ्यासाठी होणारा खर्च बघता संपूर्ण लादी घेणेच स्वस्त पडणारे होते. अखेर ' हरिभाऊ' काकांनी आनंदाने बर्फाची लादी आणून द्यायचे कबूल केले. ते ज्या कामासाठी आले होते तेही झाले होते. 

        सगळे कसे जुळून येत आहे म्हटल्यावर वडील तडक दुकानांत गेले. बदाम, काजू, वेलची, चारोळी असे सगळे जिन्नस थोडे थोडे घेवून आले. वडिलांचा उत्साह इतका वाढला होता की कधी एकदा मशिन घरी येते असे त्यांना झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आईला जास्तीचे दूध मागविण्या विषयी आठवण करून दिली. आई दूध आणून देणाऱ्या काकांशी बोलत असतांनाच वडिलांनी न राहवून," चांगले घट्ट दूध आणून द्या बरं कां.... पाणी मिसळू नका. घट्ट बासुंदी व्हायला हवी"अशी सूचना केली तसे ते काका," कोणी खास पाहुणे येणार आहेत का घरी.? " बोलून गेले. वडील अगदी खुशीत," या वेळी पाहुणे नाहीत.... आम्ही घरी आयस्क्रिम बनविणार आहोत. त्यासाठी दूध घट्ट हवे. जास्त आटवावे लागू नये "

काकाही कौतुकाने बोलले," आयस्क्रिम घरी बनविणार आहात का ? , छान... छान... काही काळजी नको मी आणून देतो उद्या जास्तीचे दूध " 

          आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त उत्साह वडिलांमधे संचारला होता. त्याच उत्साहात ते तयार होवून महाविद्यालयात गेले. संध्याकाळी ते ठरल्याप्रमाणे आयस्क्रिम मशिन घेवूनच घरी पोहचले. 

आयस्क्रिम मशीन  या शब्दामुळे ' मशिन मधे दुध टाकले तर  आयस्क्रिम तयार होवून बाहेर येणार ' आशी काहीशी माझी समजूत झाली होती. जेव्हा प्रत्यक्षात लाकडी बादली रुपी ते मशिन बघितले तेव्हा उद्या खरंच आयस्क्रिम मिळणार आहे का? याची मला शंका वाटली होती.

      दिसायला लाकडी बादली जरी दिसत असली तरी तिची किंमत बघता आईने आम्हाला त्या बादलीकडे फिरकूही दिले नाही. "उद्याच आयस्क्रिम बनवितांना तिचे निवांत दर्शन मिळणार आहे "असे जाहीर करून टाकले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या पासून वडिलांना चिंता लागून राहिली होती. दूधवाले काका जास्तीचे दूध घालायला विसरणार तर नाही? विसरले तर आयत्या वेळी कोणाकडे असे जास्तीचे दूध मिळू शकते, या सगळ्याचा विचार करत असतानाच दुधवाले काका आले आणि ठरल्याप्रमाणे जास्तीचे दूध देवून गेले. दूध घेतल्या वर लगेच ते दुध आटविण्यासाठी वडीलांनी आईच्या मागे लकडा लावला. प्रत्यक्षात आईने मात्र दुध फक्त तापवून ठेवले. वडिलांना स्पष्टीकरण देत सांगितले," आताच दुध तयार करायला घेतले तर तुम्ही सगळे आयस्क्रिम बनविण्या आधीच बासुंदी म्हणून सगळे संपवून टाकाल "

आईचे म्हणणे शंभर टक्के खरे होते. म्हणून वडिलांनाही काहिच बोलता आले नाही. आता लगेच करण्यासारखे काही नसल्याने वडिलांना दूसरी चिंता सतावू लागली. हरिभाऊ बर्फाची लादी आणून द्यायला विसरले तर ? बर्फाची लादी वेळेत आली नाही तर? कारण लादी आणून द्यायचे ठरले होते परंतू लादी कधी आणून द्यायची त्याची वेळ ठरवली नव्हती. आयस्क्रिम तयार व्हायला आठ ते दहा तास लागणार होते. आजचा एक दिवस फक्त हातात होता. आयस्क्रिम बनविण्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच वस्तू घरात हजर होत्या.  वडिलांच्या  अती आग्रहामुळे अखेर आईने जास्तीचे घेतलेले दूध आटवून ठेवले . आता फक्त बर्फाची लादी घरात आली की आयस्क्रिम तयार करण्याला वेग येणार होता. वडीलांची घालमेल वाढू लागली. त्यांची घर ते गेट.... गेट ते घर अशा फेऱ्या सूरु झाल्या. या दरम्यान त्यांच्या बरोबरीने आम्हीही आटवलेल्या दुधाची चव चाखून पाहिलीच.

आयस्क्रीम बनेल तेव्हा बनो... मला तर माझ्या वाट्याचे दूधच पिवून घ्यावे वाटू लागले. दुधाची अप्रतिम चव जिभेने चाखल्याने आता आमच्या भावंडांच्या ही जीवाला चैन नव्हते . वडिलांचा धीर ही सुटला होता. त्यांनी घराबाहेर पडून बर्फ कूठे मिळतोय का तेही पुन्हा पडताळून बघितले. बर्फ भरपूर लागणार होता आणि रसवंतीवाले कोणीही द्यायला तयार नव्हते.

        अकरा... साडे अकराच्या दरम्यान हरिभाऊ बर्फाची लादी घेवून आले. बर्फाचा कारखाना उघडायलाच  दहा..साडे दहा झाले असल्याने त्यांनाही उशीर झाला. त्यांनी न विसरता लक्षात ठेवून काम केले होते याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागला. वडिलांनी त्यांना रिक्षा भाडे देवू केले ते त्यांनी घेण्याचे नाकारले," तुम्ही माझ्या अडीअडचणीला धावून येता. अन् मी फक्त बर्फ आणून द्यायचे पैसे घ्यायचे.... असं कसं चालेल." म्हणत त्यांनी आमचा निरोप घेतला. गरिबितही हा माणूस मनाची श्रीमंती दाखवून गेला 

आता वडीलांची लगीन घाई सूरु झाली. मोठी लाकडी बादली आमच्या मधल्या खोलीच्या मधोमध ठेवण्यात आली. तिच्यावरचं लाकडी झाकण काढल्या गेले. त्या बदलीच्या मधोमध एक आल्युमिनियमचा  डबा आडव्या रॉड वर लटकवलेला होता. त्या डब्याला झाकण होते. या डब्याभोवती लाकडी बादलीत असलेल्या रिकाम्या जागेत बर्फाचे तुकडे आणि मीठ असे मिश्रण भरून टाकल्यावर त्या डब्यात आटवलेले दूध ठेवायचे. वरच्या लाकडी झाकणाला मधोमध एक छिद्र होते. त्यात आतल्या बाजूने एक रवी सदृश्य रॉड  घालावा लागायचा, लाकडी झाकण लावून घ्यायचे. ती रवी त्या तळा पर्यंत डब्यात बुडेल अशी ठेवायची. आता झाकणावर अशी एक रचना ठेवायची की त्या मधे हा बाहेर आलेला रॉड फिट बसेल. हात शिलाई मशीनला जसे हाताने फिरवता येते तशीच काहीशी ही रचना होती. बर्फामुळे डब्याच्या कडेने आतील बाजूचे दूध घट्ट होवू लागले की साधारण दर एका तासाने लाकडी झाकण न उघडता  बाहेरूनच एक हॅण्डल फिरवले की आतले दूध ढवळून निघावे. बर्फाचा थंडावा संपूर्ण दुधात समान पसरत रहावा यासाठी अशी रचना केलेली होती.

वडिलांनी पटपट सगळे सोपस्कार पूर्ण केले. सगळे सोपस्कार पूर्ण करत असतांना त्यांनी उत्साहाने आम्हाला अनेक गोष्टी संबधी सविस्तर माहिती दिली. बर्फात मीठ मिसळले असता बर्फ लवकर वितळत नाही. लाकडी बादलीमुळे आतली थंडी बाहेर येत नाही आणि बाहेरची गरमी आत जात नाही. 'लाकूड उष्णतेचे वाहक नाही' याचे प्रात्यक्षिक दाखविले. आतले दूध हे डब्याच्या कडेने घड्ड होते आणि मध्यभागी पातळ असते हे दाखवत," आतील भांडे हे मुद्दाम धातूचे आहे कारण धातू हे उष्णतेचे उत्तम वाहक असतात" याचेही स्पष्टीकरण दिले. लाकडी झाकण न उघडता दुधात ठराविक वेळेने रवी फिरवल्याने दुधाचे तापमान एक सारखे होत अधिक थंड होण्यास फायदा होतो. त्यामूळेच साधारण सहा ते आठ तासाने दुधाचे द्रव रूप जावून त्याला घन रूप प्राप्त होण्यास मदत होते. यातील विज्ञान ही सविस्तर सांगितले. वडिलांनी आईसक्रीम बनविण्याच्या निमित्ताने त्याच्या संदर्भातील सगळेच वैज्ञानिक मुद्दे इतक्या उत्साहात समजावून सांगितले की  त्यांना हेच सगळे मुद्दे प्रात्यक्षिक दाखवून समजावयाचे होते याची आईला खात्री पटली. आता लगेच काही आयस्क्रिम मिळणार नाही याची कल्पना येवून आम्ही भावंडांनी बर्फाकडे मोर्चा वळवला. "अरे.. असे बर्फ चघळत बसाल तर उन्ह लागेल" असे आईने खुप समजाविले परंतु बर्फ पहील्यांदाच हातात घेणाऱ्या आम्हाला तिचे बोलणे ऐकू येत नव्हते.

खूप कष्टाने आम्ही पाहिले दोन तास दम धरला. उघडून बघूया का? हाच मोह अनावर होऊ लागला .

अखेर वडिलांनी ते लाकडी झाकण उघले तसे आम्ही आमच्या हातात आसलेल्या वाट्या पुढे केल्या. आमचा डाव आईच्या लक्षात आल्याने, तिने खुप विरोध केला. अशाने आयसक्रिम बनण्या आधीच दूध संपलेले असेल याची तिला भिती वाटू लागली. वडिलांनाही आमच्या सोबत थोडे थंड दुध चाखून बघण्याचा मोह झाला. त्या थंड दुधाच्या चवीने माझ्या मनावर असे काही गारूड घातले की माझ्या बाल मनाला उन्हाळ्यात केवळ असे थंड दुध पिल्याने/खाल्यानेच स्वर्गीय गरव्याची अनुभूती मिळू शकते असे वाटून गेले. त्या मोहाच्या क्षणी आयस्क्रिम वगैरे सगळे झूठ.....  वाटू लागले.

 आम्ही भावंडांनी पुन्हा एकदा बर्फाकडे मोर्चा वळवला. बर्फाचा गारे गार तुकडा चोखण्यातही गंमत वाटली.

  आयस्क्रिम मशिनमधे  रिकाम्या झालेल्या छोटया जागेतही पुन्हा एकदा  बर्फ भरण्यात आला. उरलेला सगळा बर्फ आईने शेजारी  वाटून टाकला. 

चार वाजता अधीर होवून आम्ही पुन्हा आपापली वाटी सांभाळत मशिन भोवती गराडा घातला. वडिलांनी मशीनचे झाकण उघडले. आता दुधाला आधीपेक्षा बरेच घन स्वरूप प्राप्त झाले होते. ते बघून तोंडाला सुटलेल्या पाण्यामुळे अजून थांबणे अशक्य वाटू लागले. आमच्या समाधानासाठी पुन्हा एकदा आमच्या वाट्यांमधे आयस्क्रिम रुपी प्रसाद दिला गेला.त्याची चव शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी अप्रतिम होती. सोबतीला गारे गार स्पर्श जिभेला सुखवून टाकत होता. वाटीतला प्रसाद संपला पण मनातली हाव काही संपत नव्हती. उलट ती अधिकच जोर धरू लागली. अखेर "मला नंतर काही नको, माझ्या वाट्याचे अयस्क्रिम मला आताच हवे" म्हणत मी माझ्या मनातली लोभाला वाट मोकळी केली. 

बाल मनाने कितीही समजूतदारपणे शब्द दिला तरी आईच्या लेखी त्याला काहीच अर्थ नव्हता. आईनेही मग जाहीर करून टाकले," तुम्हा तिघांची तयारी असेल तर सगळ्याची आताच समान वाटणी करून टाका... मला नंतर वाद नको." खर तर वडिलांनाही हेच हवे होते पण आईपुढे त्यांना आमच्या सारखा बाल हट्ट करणे कठीण गेले असते. त्यांनी लगेच पडत्या फळाची आज्ञा घेवून सगळ्या घन रुपी दुधाची सामान वाटणी करण्याचे काम हाती घेतले. कारण सतत वाटीभर चव घेण्याच्या नादात तसेही फार काही भांड्यात शिल्लक नव्हतेच.

      आम्ही आमच्या वाट्या सरसावून बसलो. तेवढ्यात आईने अजून दोन वाट्या वडीलांपुढे आणून ठेवल्या. आमच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले. आईने स्पष्टीकरण दिले," शेजारी द्यायला हवे आहे" खरं तर त्या वेळी आईच्या समाज सेवेचा राग आला होता. आमच्या चेहऱ्यावर नाराजी लपविता आली नाही. आईला बहुदा त्याची जाणीव झाली," आठवडाभर आयस्क्रिम करणार आहोत म्हणून जो काही प्रचार केला आहे त्यासाठी निदान सख्या शेजाऱ्यांना तरी वाटी भर द्यावेच लागणार आहे. ते सगळे सकाळ पासुन तुमचे हे प्रयोग बाहेरूनच बघून जातात आहे. हवे तर मला माझा वाटा देवू नका. पण या दोन वाट्या तेवढ्या भरून द्या " 

            आमच्या घरात कुकरची तिसरी शिट्टी झाली की," काकू भात झाला का हो, आमच्या पिंट्याला भात खायचा आहे आणि अजून माझे कुकरच गॅसवर चढले नाही " किंवा भाजीच्या फोडणीचा वास आला की थोड्याच वेळात ," अमूक भाजी केली का आज तुम्ही? आमच्या यांना ऑफिसला जायला उशीर होतोय आणि अजून माझी भाजी निवडून व्हायची आहे " तर कधी " तुमच्या हातची अमूक भाजी नानांना आवडते" म्हणत  सोबत आणलेली वाटी बेधडकपणे आईच्या हाती देणारे ...... असे आमचे सख्खे शेजारी. वेळ प्रसंगी स्वतः चटणी, लोणचे चपाती असे खावून , त्यांना कधी रिकाम्या हाताने / वाटीने न पाठविता आईने जपलेले असे हे , सगळे जीवाभावाचे सख्खे शेजारी. अर्थात त्यांचीही आमच्यावर फार माया.....  एरवी रिकाम्या वेळात त्यांच्यात घरात आमचा दंगा चालायचा, न सांगताही मदतीला धावून येणारे, अर्ध्या रात्री गावावरून  येणार म्हणून आमची वाट बघत जागणारे, आल्यावर हक्काने गरम जेवण तयार करून जेवू घालणारे ..... जीवा भावाचे घरमालक... सख्खे शेजारी.  त्यांचा आमच्यावर जीव होताच... नाहीतर आमच्या घरात आयस्क्रीम बनते आहे याचा आम्ही एवढा गाजावाजा करूनही ते आज काही बेधडकपणे वाटी घेवून आले नव्हते. 

         तिच्या  बोलण्याने आमचा नाईलाज झाला. वडिलांनी वाटणी करायला घेतली तेव्हा लक्षात आले की वाट्यांची संख्या जास्त आणि उरेलेले घन रुपी दूध कमी . त्यातही शेजारी द्यायच्या दोन वाट्या भरून घेतल्यावर आमच्या वाट्याला एक पळी भर देखील घन रुपी दूध आले नाही. 

पूर्ण आयस्क्रिम तयार होण्या आधीच आम्ही वाट्या घेवून आल्याने. नुकतेच घन रुप धारण केलेले दूध बाहेरच्या गर्मीने पुन्हा पूर्व पदावर येवू लागले होते. आईने लगेच दोन वाट्या घेवून शेजारच्यांकडे मोर्चा वळविला. आम्ही मात्र काहीसे खट्टू झालो. तरी घन रूपी दुधाचेचे द्रव रूप होण्याआधी पटापट  आयस्क्रिम खाण्यास सुरूवात केली. पाणी सदृश्य पदार्थाच्या तीन अवस्था या निमीत्ताने नुसत्या बघितल्या नाही तर काही चाखताही आल्या.

आईला अगदीच चवीला म्हणून ठेवलेले आयस्क्रिमही वितळून गेले. ती आल्यावर तिला ते दिले. आमच्या नजरेतला हावरटपणा किंवा तिचा मूळचा प्रेमळ स्वभाव कारणीभूत झाल्याने तीने त्या विरघळलेल्या आयस्क्रिमचा ही आम्हाला एक एक चमचा भरवला.

 घन रुपी आयस्क्रिममुळे जिभेला बधीरपणा आला होता . त्यावर द्रव रुपी आयस्क्रिमच्या चवीने मात केली. वाटी रिकामी झाल्यावर मात्र वाटू लागले की, पूर्ण आयस्क्रिम बणेपर्यंत थांबायला हवे होते.  त्या आयस्क्रिमला हळू हळू वितळू द्यायचे आणि मग थोडे घट्ट थोडे पातळ असे ते आयस्क्रिम हळुवारपणे  जिभेवर ठेवून अलगद मिटलेल्या डोळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यायला हवा होता. त्या कल्पनेतही किती सुख होते.

 आता ..... नजर आयस्क्रिम मशीन मधल्या रिकाम्या डब्यावर गेली. कुबेराचा खजिना कोणी लुटून नेला असावा असे अपार दुःख मनात दाटून आले. 

आई वडिलांचे संवाद सुरू झाला. 

वडील," माझ्या मित्र बोलला , ते आईस्क्रीम तयार करून फ्रीज मध्ये ठेवतात आणि मग हळू हळू लागेल तसे खातात. आपल्याकडे तर काहिच उरले नाही."

आई ," हे मशिन आपल्या कुटुंबाला पुरेसे नाही.  या पेक्षा मोठे मशीन घ्यावे लागेल. तेव्हा कूठे पोरांच मन भरेल. बरं झाले उरले नाही.  जास्तीचे आयस्क्रिम ठेवायला आपल्याकडे फ्रीज कूठे आहे?"

वडील," तेही आहेच म्हणा.मोठया मशिनची किंमत याच्या दुप्पट आहे." 

आई," मशीन आणि फ्रीज यांचा खर्च..... आज गेलेला वेळ, श्रम आणि पैसा यांचे गणित बघता विकतचे आयस्क्रिम आणले असते ते ही परवडले असते. किंवा मुलांना रोज चार आण्याची कुल्फी घेवून दिली तर ते अधिक खूष होतील. त्यात पुन्हा जास्तीची कुल्फी हवी असेल तर तीही घेता येईल आणि हवी तेव्हा घेता येईल. आधी पासून तयारीची गरज नाही. आजचे आयस्क्रिम म्हणजे" नाल सापडली म्हणून घोडा घेण्यासारखे झाले"

आईच्या या वाक्याने रिकामे भांडे बघून मानत दाटून आलेल्या दुःखाचे ढग विरून गेले.  आजच्या प्रयोगाने कुल्फी घेवून देणे परवण्यासारखे आहे याची आईला खात्री पटली आहे असे वाटून उद्या पासून कुल्फी वाले काका आले की आपण आपल्याला हव्या तेवढ्या कुल्फी घेवू शकतो. या आशेचे इंद्रधनू मानत अलगद अवतरले. 

वडील," खर आहे तुझे, पण मला मुलांना आयस्क्रिम तयार होण्यातली वैज्ञानिक क्रिया समजावून सांगायची होती. त्यांना अनुभव द्यायचा होता. ते काम उत्तम झाले. आजच्या खर्चाची किंमत वसूल झाली म्हणायचे .  मुलांचा दिवस मजेत गेला. तूर्तास तरी हे मशीन विकत घेणे आपल्याला झेपणारे  प्रकरण नाही. उद्या मशिन परत करून येतो." 

          मनसोक्त आयस्क्रिम खाता आले नाही. आयस्क्रिम मशीन विकत घेण्या इतपत आपली आर्थिक परिस्थिती नाही. या निराशाजनक विचारांचा मनात प्रवेश देखील झाला नाही. आई वडील बोलले तसे, आम्हीं एका कुल्फीने खूष होणारी मुले होतो. आजचा आमचा दिवस फारच व्यग्र आणि मजेत गेला होता. तसेच भविष्यात रोज कुल्फी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. "उम्मीद पे दुनिया कायम हैं "..... , याची प्रचिती आली.


 आयस्क्रिम मशीन आमची नव्हती परंतू तिच्या योगे आमच्या आयुष्यात आलेले आनंदाचे क्षण, अनुभव व गोड आठवण..... मात्र आमची होती आणि कायम राहील.

©️ अंजली मीनानाथ धस्के 

सोबतीला रांगोळी आहेच.......... 




गणवेष

 #गणवेष

©️ अंजली मीनानाथ धस्के 

'गणवेष ' हा शब्द ऐकण्यात बोलण्यात आला की आपल्याला बालपणीची आठवण होते. शालेय जीवनात प्रवेश करतांना हाच आपला सोबती असतो. या गणवेषामुळेच आता आयुष्यात ' शिस्त ' या प्रकाराशी ओळख होते. बेफिकीर असलेल्या बाल मनाला शिस्तीचा पाठ देवून 'वेसण ' घालण्याचे काम चोखपणाणे केले जाते. पुढे पुढे गणेवेषाबद्दल आदर भाव निर्माण होवून अंगावर गणवेष असे पर्यंत आपणही शिस्तीचे काटेकोर पालन करायला लागतो. शाळा सुटते, गणवेष मागे पडतो तरी त्या योगे लागलेली शिस्त काही अंशी आपली सोबत करतच असते. आयुष्यात अनेक गणवेष आपल्या परिचयाचे होतात.  कपड्यांचा खाकी रंग असला तरी सायकल, पत्रांचे गठ्ठे आणि शबनम बॅग असेल तर 'पोस्टमन ' काका. शाळेय वर्गात सूचनांचे राजिस्टर घेवून येणारे चपराशी/शिपाई काका. मोटार सायकलवर ऐटीत जाणारे पोलीस काका. बस मधे "पुढे सरका", "तिकीट तिकीट" असे ओरडणारे कंडक्टर काका आणि बेल वाजली की बस गाडी पुढे नेणारे ड्रायव्हर काका. कपड्यांचा रंग एक असला तरी त्या त्या गणवेषाशी निगडीत जबाबदाऱ्याही समजू लागतात.

        गुलाबी/निळ्या रंगाची साडी घालून सफाई करणाऱ्या महीला बघून त्यांच्या आयुष्यातील गणवेश आणि शिस्त या दोघांची नव्याने जाणीव होते.  त्यांच्या आयुष्यात गणवेश हा ' शिस्ती ' पेक्षा ही जास्त असे खूप काही घेवून येतो. त्यांना गणवेष मिळाला म्हणजे पगाराची खात्री, दोन वेळच्या जेवणाची खात्री, घरातील मुलाचे रडत रखडत का होईना शिक्षण होण्याची खात्री.... आणि बरेचं काही. रोजगाराची हमी देणारे गणवेष समाजात आनंदाने स्वीकारले जातात.असो.....

   रूप कुठेलीही असो  डोळ्यांना सहज दिसणारा हा गणवेष प्रत्येकालाच परिचयाचा असतो.  शाळेत जाणारा असो वा नसो प्रत्येकाचा आपला असा एक गणवेष असतोच. आपल्याच या गणवेषाला मात्र आपण अनभिज्ञ असतो. प्रश्न पडला असेल की कोणता गणवेष?

तर..  ........

बल्यावस्थेतून पौगंडावस्था..... तारुण्यअवस्था, ..... वृद्धावस्था..... असा आपला प्रवास सुरू असतांना आपले 'व्यक्तिमत्त्व ' घडत जाते. हे जे काही व्यक्तिमत्त्व घडत जाते तेव्हा मनावर कळत नकळत होणाऱ्या संस्कारातून ' विचारांचा गणवेष ' मनावर चढत जातो. गंमत अशी की, मानवाला हा गणवेष दिसत नाही.... दिसत नाही म्हणुन टाकून देता येत नाही. अंगावर ' गणवेष ' असो वा नसो मनावर ' विचारांच्या गणवेषाची जशी विण' तसेच वर्तन मनुष्य करत जातो. सगळयात महत्त्वाचे म्हणजे अंगावरच्या गणवेषाने मिळणारे पद, अधिकार ,जबाबदाऱ्या यांचे पालन  काटेकोर व्हावे यासाठी मनावर  'विचारांचा गणवेष' ही त्याला साजेशा हवा अन्यथा आपली निराशा होवू शकते. 

अंगावर परिधान केलेल्या गणवेषाशी विसंगत वर्तन मनुष्य सहतेने करू शकतो  परंतू मनावर असलेल्या 'विचारांच्या गणवेषा ' विरूद्ध बंड पुकारणे खुद्द मनुष्याला अवघड होवून बसते. "माझ्या तत्वात हे बसत नाही" ,  असे उद्गार याच गणवेषाची देन आहे.

      दुराग्रही, कंजूस, लोभी, सालस, निर्मळ, निरागस अशी विशेषणे आपल्या व्यक्तिमत्त्वाला लागतात ती याच 'विचारांच्या गणवेषामुळे '.

       सुरवातीला याची विण कच्ची असते परंतू नंतर नंतर ही विण घट्ट होत जाते. मनुष्याने त्याच्या 'विचारांच्या गणवेशषात' कच्चे धागे वेळच्या वेळी काढून टाकणे,  योग्य धागे नव्याने विणणे, हे कायम सूरू ठेवावे . म्हणजे मग हा गणवेष कायम नव्या सारखा राहतो.चांगल्या विचारांची कास धरत जो मनुष्य डोळस पणे आपल्या वर्तनात काळ, स्थळ, घटना यांच्यानुसार योग्य बदल करत जातो त्याला ' परिपक्व व्यक्तिमत्व ' अशी ओळख मिळते. कारण त्याची ' विचाराच्या गणवेषात ' योग्य वेळी योग्य ते बदल स्वीकारण्याची तयारी असते. 

        केवळ अंगावरचा गणवेष एक सारखा आहे म्हणून कोणाशी मैत्री होत नाही. विचारांचा गणवेष जिथे एक सारखा असतो तिथे मात्र नाते कोणतेही असो आनंदाचे नंदनवन फुलते. 

  अनेक जण समोरच्यानुसार 'विचारांचा गणवेष' बदलत निभावून नेतात. एखाद्या मोठया संघाचा भाग होतात. तर अनेक जण स्वत:च्या 'विचाराच्या गणवेषा '  वर इतके ठाम असतात की ते एकटे पडतात. तर काही जण या एकटेपणाला घाबरून सतत विचारांचा गणवेष बदलत राहतात. शरीरावर आसलेल्या  गणवेषाला काल मर्यादा असते परंतू विचारांचा गणवेष स्मशानातील चीतेपर्यंत सोबत तर करतोच, त्यांची कीर्ती चिरकाल टिकणारी असते.

     आपल्या ' विचाराच्या गणवेषावर ' आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा प्रभाव असतो. वाईट अनुभवातून कच्चे धागे काढून टाकायला मदत होते तर चांगल्या अनुभवातून नवीन धाग्यांचा समावेश करतात येतो. यात अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काही धागे आपण जन्मजात घेवुन आलेले असतो तर बाकी सगळे धागे हे चांगल्या वाईट अनुभवातूनच तयार करत असतो. गणवेषाचे विणकाम मात्र आयुष्याच्या शेवटपर्यंत करत रहायला हवे. अन्यथा ज्याने विणकाम थांबवले तो शरीराने नाही परंतु मनाने काळाच्या पडद्याआड जातो. अंगावरच्या गणवेषाला स्वच्छ धुवून, कडक इस्त्री करून जसे जपतो तसेच या अदृश्य गणवेषाला सकस विचारांच्या धाग्याने वेळोवेळी रफू ही करायला हवा.

तेव्हा तुम्हीही थांबला असाल तर नव्या जोमाने गणवेषाचे विणकाम/ शिवणकाम /रफु करायला घ्या. करण........

शाळेत शिकवत असताना एका  ग्रामीण गीत ऐकण्यात आले होते. 

"आम्ही 'बी ' घडलो... तुम्ही ' बी '  घडाना "

गातांना  गाण्याची पद्धत बदलून अर्थाचा अनर्थ करून मजा घेणाऱ्या काही निरागस मुलांनी घडता घडता बिघडते, तर बिघडत आहे असे वाटतांनाच खूप काही घडूनही जाते याचा अनुभव दिला.

©️ अंजली मीनानाथ धस्के 

सोबत रांगोळी आहेच.... ..... आजची रांगोळी  ' खापर्डे बगीचा प्राथमिक शाळा' अमरावती. या माझ्या शाळेला समर्पित आहे.



गुढी पाडवा २०२४

 #गुढी पाडवा २०२४

आपल्या मनात एक तरी अशी खिडकी असावी जिथे प्रत्येक भावना व्यक्त करता यावी. सुख- दुःख, राग - लोभ, इर्षा , मत्सर, प्रेरणा, दया, सगळया पासून विरक्तही होता यावे. अन्  या विरक्तीचाही उत्सव वाटावा.  मोकळे पणाने जगण्यासाठी अशी एक खिडकी हवीच. 

आजच्या रांगोळीतही  खिडकीत गुढी उभारलेली आहे. या खिडकीत फुलझाडांच्या कुंड्याही आहेत. बाहेरचा रंग जरा उडाल्या सारखा वाटत असला तरी आतल्या बाजूने मात्र प्रसन्न वातावरण असल्याची खात्री देणारा रंग आहे. खिडकी म्हंटली की पडदा ही आलाच पण आज त्याला बाजूला सारले आहे. 

आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपणा सर्वांना सुख, समृद्धी व आनंदाचे जावो हिच सदिच्छा.

रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/tzaOA9aIoAs?si=c_khJF-0OJdUAueX

चैत्रांगण... ही एक रांगोळी नसून आपली संस्कृती आहे.

 कसे काढावे? बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/Fug5nWsVy9g?si=AESFct1eXLH4-12e






प्रवास

  #प्रवास

©️ अंजली मीनानाथ धस्के 

               आज 'प्रवास ' या शब्दाची आठवण होण्याचे कारण, मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. सगळ्यांचेच प्रवासाला जाण्याचे बेत आखणे सुरू आहे. माझ्या बाबतीत लहानपणापासून उन्हाळा आणि गोष्टीची पुस्तके यांचे एक अतूट नाते आहे. म्हणूनच आज मी एका आगळ्या वेगळ्या तरीही अनेकांच्या आवडीच्या प्रवास प्रकारा बद्दल लिहिते आहे.
                    मला कायम  वाचन करायला घेतलेले पुस्तक हा एक ' प्रवास' वाटतो. पुस्तक रुपी प्रत्येक प्रवासाची सुरुवात, ही एका अंधाऱ्या  बोगद्यातून होते . मला लहापणापासूनच प्रवासातील बोगद्याचे कुतूहल वाटायचे. लांबच्या प्रवासात एक तरी बोगदा लागावा असे वाटायचे. बोगद्यातून जातांना अनामिक हुरहूर वाटायची. रस्ता, जायचे ठिकाण माहितीतले असले तरी बोगद्यातून बाहेर आल्यावर पुढे काय असेल ?
 याची उत्सुकता वाटते. तसचं पुस्तक हातात घेतल्यावर आणि त्याची पहिली काही पानं वाचल्यावर त्यातली सगळी पात्रं हळूहळू लक्षात यायला लागतात . हि सगळी प्रक्रिया मला एका बोगद्या सारखी भासते. पुढे काय असेल याचा केवल अंदाज बांधणे सूरु असते. परंतू पुढे काय आहे हे अंदाजा पेक्षा वेगळे निघते तेव्हा मग सुरू होतो बोगद्या बाहेरचा खरा प्रवास . 
          पुस्तकाच्या बाबतीत बोगद्याच्या भाग लांबलचक असला की, पुढे प्रवास कितीही छान असला तरी अनेक वाचक तिथपर्यंत जात नाहित. काही जण हा बोगदा वगळून डायरेक्ट मुख्य प्रवासाला सुरुवात करतात आणि मग कथेतल्या पात्रांची नीट ओळख न करून घेतल्याने पुढे वाचकाचा बराच गोंधळ होतो. काही पुस्तक प्रवासामध्ये छोट्या छोट्या बोगद्यांची योग्य पेरणी केलेली असते. तर काही पुस्तकामध्ये एकही बोगदा नसतो. या पुस्तक प्रवासाची रचना कशी असावी हे जरी सर्वस्वी लेखकावर अवलंबून असले तरी त्या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी वाचक मात्र तयारीचा लागतो. 
          अनेकदा असा अनुभव येतो की, एखादे पुस्तक आवडणे किंवा नावडणे हे सर्वस्वी वाचकाच्या मानसिकतेवरही अवलंबून असते.एका जागी बसून चित्त एकाग्र करणे कठीण जात असेल तेव्हाही मोठया कथा, कादंबऱ्या वाचल्या जात नाहीत.
       प्रवासाची आवड असेल तर केवळ संयमाने वाचन करून अनेक समृध्द कलाकृतीचा अनुभव घेता येतो. विशेष म्हणजे मला आवडलेला एखादा पुस्तक प्रवास इतरांनाही आवडेलच असे होत नाही. कारण  कधी कोणाला 'बस/गाडी लागते ' म्हणजे वाचनाचे वावडे असते, कधी कोणाला वेगाचे वेड असते म्हणजे कथानक  वेगवान पद्धतीने पुढे जाणारे लागते, कधी कोणाला बोगदा नको असतो म्हणजे पात्र परिचय किंवा कथेची प्रस्तावना नको असते, कधी कोणाला लांबचे प्रवास झेपत नाहीत म्हणजे कादंबरी प्रकार वाचण्यासाठी जड जातो, कधी कोणाला प्रवासात अनेक थांबे हवे असतात म्हणजे कथासंग्रह वाचणे आवडते , काहींना प्रवासाबाबतीत विनोदी /हलकेफुलके/रहस्यमयी/गूढ/वैज्ञानिक/ तत्त्वज्ञान /शृंगारिक अशा अशयाचा आग्रह असतो. काहींना प्रवासात सगळ्याच आशया सोबत सगळेच हवे असते म्हणजे बोगदा,वेग, उत्सुकता, थांबे, वळण इत्यादी. काहींना साधा सरळ प्रवास आवडतो तर काहींना नागमोडी .
अनेकदा इतरांनी डोक्यावर घेतलेला पुस्तक प्रवास आपली घोर निराशाही करू शकतो.
          वाचक म्हणून मला अशा काही मर्यादा मी ठेवत नाही. मिळेल ते वाचण्याची सवय लागली आहे. थोडक्यात काय तर प्रवासाची आवड आहे. त्यामूळे अनेकदा  प्रवास आवडत नसला तरी संयमाने वाचन करत प्रवास पूर्ण करण्याकडे कल असतो. बऱ्याचदा अर्धा प्रवास रटाळ वाटत असतांनाच शेवट मात्र काहीतरी चांगले देवून जातो. इथे एक सांगावेसे वाटते की प्रवासाची आवड असेल परंतु वेळ नसेल किंवा मोठा प्रवास झेपत नसेल तेव्हा छोटया छोटया प्रवासा पासून सुरूवात करायला काहीच हरकत नसते. वाचत रहाल तर पुढे मोठे मोठे प्रवासही सहज पूर्ण करु शकाल...... 
       अनेकदा प्रवासाची सुरूवात उत्साह वर्धक होते परंतू शेवटाकडे जाता जाता घोर निराशा पदरी पडते. अनेकदा बोगदा संपतच नाही आहे असे वाटत असतांनाच बोगाद्या बाहेर एक रोलर कोस्टर वाट बघत असतो.  कधी बोगद्यातील अंधार पुस्तकातील पात्रांना समजून घेण्यास उपयुक्त ठरतो तर कधी लाईटचा उजेड, अंधार यांचा बोगद्यातील खेळ आपल्याला पात्रांच्या गर्दीत ' स्व' त्वाची जाणिव करुन देतो. कधी साधा सरळ प्रवास अचानक नागमोडी वळणे घेत पुढे जात राहतो. कधी संथ वाटणारा प्रवास क्षणात वेग पकडतो. कधी वेगवान प्रवासाला अचानक ब्रेकही लागतात. कधी हलक्या फुलक्या, विनोदी अंगाने सूरु झालेला प्रवास आयुष्याचे गहन तत्त्वज्ञान देवून जातो. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ' प्रवास ' करावाच असेही बरेच प्रवासाठीचे दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे.
               पुस्तक प्रवासाची गंमत अशी आहे की, हा प्रवास तुम्ही कधीही, कुठेही सूरु करू शकता. इतरांना तुम्ही एका जागी स्थिर भासत असला तरी तुमचा प्रवास अविरत सुरू असतो. तुमच्या वेगाचा, आनंद, उत्सुकता, समाधान, भावनांचे चढ उतार याचा अनुभव हा तुमच्या शेजारी बसलेल्या येत नाही. या सगळ्यां अनुभवावर तुमची व्यक्तिगत मालकी असते. तसेच कोणत्याही पुस्तकाचे यश अथवा अपयश हे बहुतांशी पुस्तक प्रवासाचे संक्षिप्त वर्णन कोणत्या शब्दात केले गेले आहे यावर देखील बऱ्याच अंशी अवलंबून असते. 
        लेखन करताना मला वाटते की प्रत्येकाने त्याला जसे हवे तसे  पुस्तक प्रवास लिहीत जावे. सगळ्यांचेच समाधान करणारे प्रवास निर्माण करण्याच्या आग्रहाने अनेकदा प्रवासातील नावीन्य हरवून जाते. तुम्ही निर्माण केलेल्या पुस्तक प्रवासाला वाचक कमी मिळाले म्हणजे तुम्ही निर्मितीत कमी पडला असे नसून त्या प्रवासाची आवड असणारे कमी आहेत, इतकाच त्याचा अर्थ होतो. सगळ्यांनाच सगळे प्रवास आवडू शकत नाही. एकच पुस्तक प्रवास असला तरी प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगळा असतो कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन, आवड वेगळी असते. शेवटी कोणी काय वाचावे आणि कोणी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
       एखादा पुस्तक प्रवास गंडला म्हणून लेखकाने निर्मिती थांबवायची नसते तसेच वाचकांनीही वाचणे सोडता कामा नये.
मला तर पुस्तक प्रवास कसाही असला तरी तो अनेक अनुभवाने समृध्द करणारा भासतो. 
©️ अंजली मीनानाथ धस्के 
टिपः लिखाणा सोबत रांगोळीही आहेच. 







महाशिवरात्री रांगोळी (जागतिक_महिला_दिन)

 #महाशिवरात्री

#जागतिक_महिला_दिन

#रांगोळी

' महाशिवरात्री ' आणि 'जागतिक महिला' दिन असे दोनही खास दिवस एकाच तारखेला येण्याचा योग जुळून आला आहे. आजची रांगोळीही त्याला  साजेशी अशीच झाली आहे.

  रांगोळी काढतांना  मात्र 'शिव आणि शक्ति ' दोन्ही एकच आहेत. या भावनेतून रांगोळी साकारत गेले. रांगोळी पूर्ण झाल्यावर हे लक्षात आले.


तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.......

शिव म्हणजे वडिलांचे छत्र तर शक्ति म्हणजे आईची माया.... 

शिव म्हणजे आकाश तर शक्ति म्हणजे सृष्टीतील चेतना.... 

शिव म्हणजे आत्मा आणि शक्ति म्हणजे शरीर....

शिव म्हणजे अध्यात्मिक ओढ तर शक्ति म्हणजे संसारिक ऊर्जा....

शिव म्हणजे पाणी आणि शक्ति म्हणजे पाण्याचा वेग.....

थांबलेले पाणी जसे पिण्यायोग्य रहात नाही तसेच वेगाने पुढे जाणारे पाणी रस्त्यात येणाऱ्या अनेक घटकांना नष्ट करत जाते.....  पाणी आणि वेग याचा समतोल जिथे साधला जातो त्याच नदीच्या काठावर एक ' समृध्द संस्कृती' उदयाला येते.

शिव आणि शक्ति दोन्ही एकच म्हणून' अर्धनारी नटेश्वर'  असे शिवालाच म्हणतात.  आपणही सृष्टीला स्त्री- पुरुष अशा दोन भागात न विभागता 'स्त्री पुरूष तत्व' यांचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला तर...... अनेक प्रश्न मार्गी लागतील.

 असो ..... 

'शिव शक्ति' किंवा 'महिला दिन ' दोन्ही गहन विषय आहेत.  माझ्या बौध्दिक कुवतीनुसार यांना समजून घेण्याचा माझा प्रयत्न कायम सुरूच राहील.

प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषातील ' स्त्री ' तत्त्वाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.... 

सोबतीला आजची रांगोळीही आहेच


रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 

https://youtu.be/nPdqWabqgaE?si=yI6JIBQTJbnyK5YA

©️ अंजली मीनानाथ धस्के



वॉटर बॉटल

 #वॉटर_बॉटल

©️ अंजली ममीनानाथ धस्के

        उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर शाळेचा पहिला दिवस जवळ येवू लागला तसे शाळेच्या तयारीचे जोरदार वारे आमच्या घरात वाहू लागले होते. वह्या, पुस्तके, खाकी कव्हर पेन पेन्सिल... अशा सामानाची गरजेनुसार पुनर्बांधणी आणि खरेदी असे सत्र सुरु होते.  आमच्यावेळी मोठ्या भावंडांची पुस्तके लहान भावंडांनी वापरायची असा प्रघातच होता. त्यात आम्हा भावंडांमध्ये प्रत्येकी दोन वर्षाचे अंतर असल्याने आमच्या घरीही या पेक्षा वेगळे काही नव्हते.  ताईची पुस्तके भावाला आणि भावाची पुस्तके मला देण्यासाठी जपून ठेवलेली असत. दरवर्षी फक्त त्या पुस्तकांना नवीन कव्हर घालून आम्हाला दिली जात. प्रत्येकाला नव्या वह्या मात्र घेतल्या जात. वर्षभराच्या वह्या स्वस्त मिळाव्या म्हणून एका दमात घेवून त्या आम्हाला लागतील तशा दिल्या जात. जुन्या वह्याची कोरी पाने वेगळी करून त्यापासून कच्चे काम करण्यासाठीच्या वह्या घरीच बनविल्या जात. वह्या पुस्तकांना कव्हर घालून त्यावर नवे कोरे लेबल लावले जायचे. कव्हर लावण्याचे काम वडील पार पाडायचे. त्यांना अगदी घट्ट बसणारे कव्हर घालता यायचे. घरात वडिलांचे अक्षर वळणदार त्यामुळे त्या लेबलवर वडिलांकडून नाव, विषय, वर्ग लिहून घेण्याची आम्हा भावंडांना घाई असायची. जुनेच युनिफॉर्म नव्याने इस्त्री करून तयार ठेवले जात. जुनीच दप्तरे डागडूजी करून स्वच्छ धुवून नवीन केल्याचा भास निर्माण केला जात असे. जुनेच सॉक्स निळ देवून पांढरे केले जात. जुन्याच बुटांना रगडून पॉलिश केली जायची. सगळे काही जुने असले तरी नव्या कोऱ्या वह्यांचा सुगंध,  त्यावर लावलेले  लेबल आणि शाळेत जायचा उत्साह मात्र नवीन असायचा.  

शाळेत पहिल्याच दिवशी सगळे साहित्य नवीन घेवून येणारी मुले फार थोडी असायची. वर्गात गेल्यावर शाळेचा युनिफॉर्म, वह्या, पुस्तके या सगळ्यांपेक्षा दप्तर, डबा, वॉटर बॉटल, पेन असे काही नवीन असेल तर सगळ्या मुलांचे लक्ष वेधले जायचे. असे लक्ष वेधून घेणे सगळ्यांनाच आवडायचे परंतू काहींनाच ते परवण्यासारखे असल्याने त्या बाबतीत कसली स्पर्धाच नसे. मुळात शाळेच्या नळावर हाताची ओंजळ लावून पाणी पिण्याची उत्तम सोय असल्याने मुलांच्या खांद्यावर वॉटर बॉटलचे ओझे लादणे अनेक पालकांना मान्य नव्हते. त्यामुळे वॉटर बॉटलवर वायफळ खर्च करण्याचा प्रश्नच उद्भवत नसे.

मी पहिलीतून  दुसरीत जाणार होते. माझ्या बाल मनाला, 'यंदा आपल्या जवळ काहीतरी नवीन असावे ' असे तीव्रतेने वाटू लागले होते. मागच्याच वर्षी पुढील दोनतीन वर्षे पुरेल इतका मोठा युनिफॉर्म खरेदी करून त्याला माझ्या उंचीनुसार खालच्या बाजूने टिप मारून देण्यात आली होती. त्यामुळे या वर्षी त्यावरची एक टिप उसवून उंची फक्त वाढविली जाणार हे निश्चित होते. तेलाचे डाग पडलेले जुनेच दप्तर जेव्हा आईने स्वच्छ धुण्याचा घाट घातला तेव्हाच नवीन दप्तर मिळण्याची आशाही मावळली होती. कव्हर आणि वह्यांच्या खरेदी साठी जेव्हा बाबांना बाजारात जायचे होते तेव्हा मात्र काहीतरी करून नवीन वस्तूचा जुगाड करायलाच हवा या हेतूने मी आणि माझ्या भावाने " मीही सोबत येणार" चा घोषाच लावला. अखेर वडिलांनी," मी तुम्हाला फक्त सोबत नेणार आहे. तिथे गेल्यावर काहीच मागायचे नाही. मी काहीही.... काहीही घेवून देणार नाही. तिथे जर हट्ट केला तर दणके मात्र देईल " अशी धमकी दिली.  तरी आशावादी विचार डोक्यात आले . ' पुढचे पुढे बघू... सध्या तरी सोबत बाजारात जाण्याची संधी सोडता कामा नये '  म्हणत माझ्या बाल मनाने लगेच  बाबांना होकार दिला. त्यांनीही मग आम्हाला सोबत नेले. वडील ज्या दुकानात वह्या, कव्हर, लेबल अशी खरेदी करत होते. त्याच्या शेजारच्या दुकानात नवी दप्तरे, वॉटर बॉटल, रेनकोट, असे बरेच काही लटकवले होते. माझे सगळे लक्ष काय बघू आणि काय नको या भावनेने विचलित झाले. वडिलांनी माझ्या हापापलेल्या नजरेला नियंत्रीत करण्याचा अपयशी प्रयत्न करत पुन्हा एकदा धमकीची आठवण करून दिली," मी काहीही घेवून देणार नाही. उगाच हे सगळे बघण्यात वेळ वाया घालवू नको." माझ्या भावाला आशा होती की नवीन पेन, कंपास बॉक्स, बाजारात  नुकत्याच आलेल्या लीड पेन्सिल असे काहीतरी तो नक्की मिळवू शकतो. त्याने वडिलांसोबत स्टेशनरी दुकानाकडे मोर्चा वळवला होता. मी मात्र मनातील हाव लपवत निरागसपणे ," काही नाही मागत.... एकदा बघते फक्त," असे बोलून वेळ मारून नेली. वडिलांनीही मग माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत ठरवलेली खरेदी करण्यावर भर दिला.

भावाने ," पप्पा हे बघा ना .... किती छान आहे" असे म्हणत अनेक वस्तूंकडे वडिलांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतू प्रत्येक वस्तूकडे वडिलांनी कटाक्षही न टाकता," छान आहे" असे म्हणत विषय टाळून दिला. 

इकडे माझी नजर  दुकानाबाहेर दहा बारा वॉटर बॉटल एकत्र लटकविल्या होत्या तिथे स्थिर झाली. अनेक पर्याय उपलब्ध असले तरी सगळ्यांच्या किमती ऐकून मीच स्वस्त पर्याय शोधत होते.  एक वॉटर बॉटल माझ्या मनात भरली होती. तिच्या किमतीची चौकशी करतांना तीच सगळ्यात स्वस्त होती असेही समजले. मनाने मी ती बॉटल कधीच खरेदी केली होती. आता फक्त वडिलांना पैसे देण्यासाठी भरीस कसे पाडायचे? हेच ठरवायचे होते. मी काही ठरविणार त्याआधीच वडील ," झाली खरेदी... चला घरी जावूया " असे बोलून ठरविलेल्या तीन चाकी रिक्षाकडे जायला निघाले. माझा धीर सुटला. मी अतिशय केविलवाणा चेहरा करत त्यांना बोलले," पप्पा फक्त एकदा हि वॉटर बॉटल बघा ना" . त्यावर ते मात्र ठामपणे बोलले," मी आधीच सांगितले होत... काहीही घेवून देणार नाही". मीही बोलले," एकदा बघाना फक्त"  माझ्या मागेच उभा असलेला दुकानदारही बोलला," बघायला काय जातं.... बघायचे पैसे थोडीच लागतात साहेब" त्याच्या बोलण्याचा मान ठेवत वडिल इच्छा नसतांनाही ती वॉटर बॉटल बघायला आले आणि ठरल्याप्रमाणे," छान आहे" म्हणत काढता पाय घेतला. मीही जिद्दीला पेटले," असं नाही.... हातात घेवून नीट उघडून बघूया". दुकानदाराने तत्परतेने ती वॉटर बॉटल खाली काढली आणि वडिलांच्या हातात दिली. यामुळे वडिल थोडे वैतागले होते. परंतू सगळ्या भावना नियंत्रीत करत आता दुकानदाराशीच बोलून हे प्रकरण मिटावावे लागणार याची कल्पना येवून त्यांनी ती वॉटर बॉटल हातात घेतली. माझ्यात अर्धी लढाई जिंकल्याची भावना उसळून आली. मी बोलले," किती सुंदर आहे ही बॉटल" त्यावर वडिल बोलले, " वॉटर बॉटल सुंदर नाही टिकावू निवडायची असते. ही फारच नाजूक दिसते आहे" म्हणत त्यांनी ती बॉटल दुकानदाराला परत केली. मी हार मानायला तयार नव्हते," पप्पा.... घेवू या ना एक बॉटल."  काही तरी नवीन मिळवायचेच या उद्देशाने आलेला, तरी आतापर्यंत शांत असलेला माझा भाऊही मग बोलला," पप्पा.... घेवू या ना एक " त्यावर ते," एक बॉटल घेवून घरात काय तुम्हा तिघांची भांडणे सोडवत बसायचे का?" संधीचा फायदा घेत दुकानदार बोलला," मग तीन घ्या ना साहेब.... सगळेच खुश " वडीलही लगेच बोलले ," अहो तिघांसाठी तीन वेगवेगळ्या घेतल्या तरी भांडणे सोडवता सोडवता नाकी नऊ येतील " त्यावर दुकानदार," एकसारख्या तीन घ्या म्हणजे भांडणाचा प्रश्नच नाही " असे बोलत एक सारख्या तीन बॉटल वडिलांच्या हातात द्यायला लागला. भावाला दुसरी वॉटर बॉटल हवी होती. त्याने त्याला हव्या असलेल्या वॉटर बॉटलकडे इशारा करत," मला ती हवी"  असे सांगितले. वडिलांनी या संधीचा फायदा घेत," बघा..... सारख्या नको असतात आणि वेगवेगळ्या घेतल्यावर घरी जावून त्याला/ तिला चांगली घेतली... मला नाही घेतली म्हणत भोकाड पसरतात. चला रे घरी.... आपल्याला एकही वॉटर बॉटल  नकोय" म्हणत ते जायला निघाले. भावाने वडिलांचा हात पकडला. त्याने माघार घेत," चालेल मला हि वॉटर बॉटल" असे सांगितले. वडिलांनी एकदा माझ्याकडे बघितले. खरं तर आपली वॉटर बॉटल हि एकमेव असावी अशी माझी इच्छा होती. हि इच्छा कायम ठेवली तर या जन्मात वडिल काही घेवून देणार  नाही याची भितीही होती. त्याने माघार घेतल्यामुळे मला वॉटर बॉटल मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मीही मग माघार घेत," घेवू ना पप्पा" म्हणत अत्यंत दीनवाणा चेहरा केला. कसा कुणास ठाऊक पण वडिलांना पाझर फुटला. मी निवडलेली बॉटल अत्यंत नाजूक वाटल्याने वडिलांनी दुसऱ्या वॉटर बॉटल बघायला सूरवात केली. भावाने लगेच त्याला जी आवडली होती त्या बॉटलकडे वडिलांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न सुरू केला.  माला मात्र आकाशी रंगाचे झाकण आणि बेल्ट असलेली, आतमधे पाणी पिण्याची बारीक नळी असलेली, पारदर्शी लंबगोलाकार, त्यावर विविध रंगात काढलेली छोटी ए, बी, सी डी अशी अक्षरे .... बॅट बॉल आशी चित्रे रेखाटलेली, नाजूक वॉटर बॉटलच हवी होती. 

      सगळ्या वॉटर बॉटल बघितल्यावर म्हणजेच त्यांच्या किमती बघितल्यावर वडिलांना त्यांची स्वतःची पसंती बाजूला ठेवावी लागली. किंमतीचा अंदाज घेत त्यांनी तीन वॉटर बॉटल न घेता आम्हा दोघांसाठी दोनच वॉटर बॉटल घेण्याचे ठरविले. त्या अनुषंगाने त्यांनी दुकानदाराशी भाव करायला सुरवात केली. अखेर मला जी वॉटर बॉटल हवी होती ती त्यांना पसंत नसली तरी केवळ त्या दोन वॉटर बॉटलची किंमत बजेट मधे बसत असल्याने त्यांनी खरेदी केली. घरी परतल्या वर ताई भांडण करणार याची खात्री असली तरी आम्हाला नवीन वॉटर बॉटल मिळाली याचा आनंद मोठा होता.

 ताई घरात मोठी असल्याने तिला दर वर्षी नवीन पुस्तके घ्यावी लागत. आम्ही मात्र तिची जुनी पुस्तके वापरत असू. याचाच फायदा घेत . वडीलांनी तिची समजूत काढली असावी. तरी आईने मात्र," कधी तरी तिलाही शाळेत न्यायला देत जा वॉटर बॉटल " असे आम्हा दोघांना समजावून सांगितले होते. उरलेला संपूर्ण दिवस मी त्या वॉटर बॉटल मधूनच पाणी पीत होते. कधी एकदा उद्याचा दिवस उगवतो आणि मी शाळेत हि वॉटर बॉटल घेवून जाते, असे मला झाले होते. दुसऱ्या दिवशी आम्हा तिघा भावंडांच्या नवीन वर्षांच्या शाळेचा पहिला दिवस...

मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे अजून प्राथमिक शाळेत असल्याने सकाळी सोबत जायचो. ताई मात्र माध्यमिक शाळेत असल्याने तीच्या शाळेची वेळ दुपारची होती. अगदी उत्साहात आम्ही तयार झालो होतो. आम्हाला रोजसाठी रिक्षा लावली होती परंतू शाळेचा 'पाहिला दिवस' खास असावा असे वाटून आम्ही वडिलांना शाळेत पोहचविण्याची गळ घातली. वडीलांनीही मान्य केले. यात एक अडचण अशी होती की आमच्या लूनावर आम्ही तिघे जाऊ शकणार नव्हतो. दोघांपैकी एकाला रिक्षाने जावेच लागणार होते. वडिलांनी पोहचवायला यावे हि कल्पना माझी असल्याने मीच त्यांच्यासोबत जावे. असा माझा आग्रह होता. भावालाही  माघार घ्यायची नव्हती. भांडणाची सुरुवात होणार हे बघता वडिलांनी जाहीर केले," मी तयार झाल्यावर जो गाडीच्या मागच्या सीटवर असेल त्याला घेवून जाणार. भांडण कानावर पडले तर तुम्हा दोघांनाही रिक्षाने जावे लागणार. कबूल असेल तर तयारी करतो. " दोघांनीही," कबूल " असे एकसुरात जरी म्हंटले तरी माघार घ्यायची कोणाचीच तयारी नव्हती. अखेर माझ्या भावाने माझ्याशी कसलीही चर्चा न करता युक्ती करून पळतच मागच्या सीटवर जाऊन बसला. तो तिथून उठायलाच तयार होईना. त्याचे दप्तर, वॉटर बॉटलही आणायला तो घरात जायला तयार नव्हता. त्याचे बुटही त्याने घातले नव्हते. एकदा तरी तो उठेल आणि मला संधी मिळेल या आशेवर मी होते. परंतू शाळेची तयारीही गरजेची असल्याने मी जिद्दीला कमी पडले. मी माझी सगळी तयारी नीट केली. मग मात्र आमची झटपट सूरू झाली. मी त्याला," तू तयार नाही झाला तर पप्पा तुला ओरडतील. उठ... उगाच मार खाशील " असे समजावू लागले तर त्याने आधीच ताईला फुस लावल्याने तिने त्याचे दप्तर वॉटर बॉटल, बुट त्याच्या जवळ आणून ठेवले होते. तो काही केल्या माघार घेत नव्हता.

 शाळेला उशीर होतोय असे जाणवता वडिल बोलले," तुझ्या पसंतीची वॉटर बॉटल घेतली ना , आता तू रिक्षाने जा.... वाटले तर पुन्हा कधीतरी तुला एकदा शाळेत सोडायला येइल" माझी निराशा मझ्या चेहऱ्यावर दिसली तसे ते म्हणाले," तुझे दप्तर आणि वॉटर बॉटल मी आणतो. तू जा रिक्षाने. शाळेजवळ भेटून तुला वर्गापर्यंत सोडतो... चालेल का?" तेवढ्यात घरासमोर थांबलेल्या रिक्षातील मित्र मैत्रीणींनी  मला आवाज दिला तसा सगळी निराशा बाजूला सारत मी ,"चालेल" म्हणत आनंदाने रिक्षाकडे धाव घेतली.

खूप उत्साह, गप्पा गोष्टी या भरात आमची रिक्षा शाळेजवळ कधी पोहचली ते कळलेच नाही. मी रिक्षातून टुणकन उडी मारून वडिलांकडे धाव घेतली. ते समोरच्या हुकला लटकवलेली आमची दप्तरे आणि वॉटर बॉटल काढण्यात गुंग होते. त्यांनी एक एक दप्तर काढत आमच्या दोघांच्या हातात दिले. वॉटर बॉटल काढून देण्यासाठी त्यांनी हात पुढे केला आणि काय झाले हे कळायच्या आत दोन्ही वॉटर बॉटल दणकन खाली पडल्या. जीला हातात घेवून मिरवायची प्रचंड इच्छा होती तीने मात्र धुळीत लोळण घेतलेली बघून माझ्या काळजाचा ठोका चुकला. वडीलांनी घाईत दोन्ही बॉटल उचलल्या. त्यांच्यावरची धूळ पुसली तसे त्यांच्या लक्षात आले. एक वॉटर बॉटल खालून गळायला लागली होती. गळणारी वॉटर बॉटल आपली नसावी अशी मी मनोमन प्रार्थना केली. ज्याची भिती वाटते तेच नेमके घडते याची प्रचिती आली. ती वॉटर बॉटल माझीच होती. वॉटर बॉटल जरी एक सारख्या असाल्या तरी आदल्या दिवशी  त्यांच्यातील फरक शोधून काढण्यासाठी आम्ही आमचा बराच वेळ खर्ची घातला होता. दोन्ही बॉटल एकसारख्या दिसत असल्या तरी मी निवडलेल्या बॉटल ची रंग छटा भावाच्या वॉटर बॉटल पेक्षा जरा फिकी होती. भावाने लगेच त्याची वॉटर बॉटल स्वत:च्या ताब्यात घेऊन त्याच्या वर्गाकडे धाव घेतली.

  त्या वेळी वॉटर बॉटल फुटली याचे दुःख आणि अजून तिला वर्गात नेऊन मिरवायचे बाकी होते याचे दुःख.... अशी दोन दुःखे एकाच दमात अनुभवल्यामुळे फारच वाईट वाटले. एकीकडे माझी वॉटर बॉटल गळत होती आणि दुसरीकडे माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते.  या घटनेमुळे वडिलांची चीडचीड झाली होती. ते," मी म्हणत होतोच की असली नाजूक वॉटर बॉटल नको..... नाही... पण माझं कोण ऐकत.... एक सोडून दोन घेतल्या..... सकाळची घाई...  उशीर होतोय मला आणि आता हा गोंधळ...." असे वैतागून बोलत होते. मला खरं तर टाहोच फोडावासा वाटत होता. पण आमच्या वडिलांच्या रागासमोर आपल्या कोणत्याच भावनेला फारसे महत्व नाही हे ही मी जाणून होते. ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होते त्याचा असा विचका झालेला मला सहन होईना. काहीही झालं तरी वॉटर बॉटल आज आपल्या सोबत असायला हवी हि भावना इतकी तीव्र होती कि मी रडतच वडिलांच्या हातातून वॉटर बॉटल घेतली आणि वर्गाकडे जायला वळले. माझा भावनावेग बघता परिस्थिती हाता बाहेर जावू नये म्हणून वडीलांनी ," आन तिला इकडे.... कपडे ओले होतील.....जा लवकर शाळेत.... घरी जावून मी हिला दुरुस्त करतो.... होईल ती ठीक.... आता जा लवकर शाळेत ... उशीर झालाय" असा समजावणीचा सुर लावला. मी मात्र हट्टी पणाने," असू द्या माझ्या जवळच " असे म्हणण्याच्या बेतात होते. परंतू त्याच वेळी खांद्याला लटकवलेल्या वॉटर बॉटलचे काही थेंब माझ्या युनिफॉर्म वर पडून तो ओला होत होता, याची जाणीव झाल्याने वडीलांनी जवळ जवळ ती वॉटर बॉटल माझ्या खांद्यावरून खेचून घेतली. त्यांच्या डोळ्यात , राग, वैताग, चीड, पैसे वाया गेल्याने दुःख सगळ्याच भावना उफाळून आल्या होत्या.  'आता माझे काही खरे नाही' अशी भीती माझ्या मनात निर्माण झाली. या दरम्यान आमच्या बाई शाळेच्या गेट वर माझी वाट बघत थांबल्या होत्या. त्यांनीही आवाज द्यायला सुरवात केल्याने वडिलांचा आणि माझा नाईलाज झाला. बाईंनी माझे डोळे पुसले आणि मला समजावत वर्गात नेले. वडिल मात्र झाल्या प्रकाराने फारच वैतागले होते. 

वर्गात गेल्यावर कोणीही वॉटर बॉटल घेवून आलेले नव्हते. हे पाहून मला स्वत:साठी फारच वाईट वाटले. उद्या वॉटर बॉटल दुरुस्त करून घेवून येवू या आशेने माझ्या निराश मनाला खूपच उभारी दिली. दिवस मजेत गेला. 

घरी आल्यावर मात्र त्या वॉटर बॉटलला बघून पुन्हा एकदा निराशेने मला घेरले. सकाळी ती ज्या स्थितीत होती त्याच स्थितीत ती आताही होती. मला वडिलांचा राग आला. 'दुरुस्त करून ठेवतो 'असे बोलून आशा जागृत करून त्यांनी मात्र तिच्यावर काहीच काम केले नव्हते. मी माझ्या बाल मनात येतील ते सगळे उपाय करून बघितले. तिचे गळणे मात्र अखंड सूरू होते. उलट आता ती जास्त वेगाने गळू लागली होती. माझी खटपट बघून आईने समजावले," हिच्या नादात आज पप्पांना कॉलेजला जायला उशीर झाला... आता ते आल्यावर हिचा विषय सुद्धा काढू नकोस. ते चिडतील.... मार खायचा नसेल तर डोळ्या आड कर हिला.... पैसे वाया गेल्याने ते आधीच चीड चीड करत होते." 

वडिलांचा राग, चीडचीड मी समजू शकत होते. त्यांना वॉटर बॉटल घ्यायच्याच नव्हत्या. त्यात हि नाजूक वॉटर बॉटल त्यांना पसंत नव्हती. भरीस भर वॉटर बॉटल त्यांच्याकडूनच फुटली होती. वस्तू घेतली तर तिची किंमत वसूल होईपर्यंत तिचा वापर केला जाणं आम्हा मध्यमवर्गीयांना अपेक्षित असतं.  परंतू इथे ती संधीच मला मिळली नव्हती. त्यामुळे ते माझ्यावर रागावू शकत नव्हते. या सगळ्या गोंधळात पैसे वायाही गेल्याची खंत होतीच.  मीही मग सत्य स्वीकारत वॉटर बॉटल चे दुःख मनात दडपून टाकले. 

इतक्यात भावाने घरात वॉटर बॉटल, दप्तर आणून टाकून दिले. तो खेळायला जाण्याची तयारी करु लागला.. आता भावाकडे वॉटर बॉटल होती तिलाच एखाद दिवशी शाळेत नेवून भाव खाता येईल का? असा एक मार्ग अजूनही शिल्लक होता. त्या उद्देशाने मला बरेच परिश्रम घ्यावे लागणार होते. भावाची अनेक कामे बिनबोभाट करावी लागणार होती. त्याची मर्जी संपादन करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार होत्या. मीही हार मानणाऱ्यातली नव्हते. सगळया कष्टासाठी मानसिक तयारी सुरू केली. मोह अनावर होऊन मी त्याच्या बॉटलकडे धाव घेतली. त्यानेही माझे मन ओळखले. मी काही बोलण्या आधी तोच बोलला," तुला हवी आहे का ही बॉटल? ..... घेवून टाक" 

त्याच्या या बोलण्याने मी खूपच आनंदून गेले. मी लगेच वॉटर बॉटलला उचलून छातीशी कवटाळले. तो उपकाराची भावना न दाखवता खेळायला पळून गेला.  मी बॉटल मिळली या आनंदातच तीला न्याहाळू लागले आणि माझ्या लक्षात आले. तिचा बेल्ट तुटला होता. त्याने गाठ मारून बेल्ट हूकात अडकवला होता. माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. आता मात्र वडिलांचा मला ओरडा खावा लागणार, याची खात्री झाली. 

त्याही परिस्थितीत मी माझ्या बॉटलकडे बघितले. तिचा बेल्ट व्यवस्थित होता. अचानक एक कल्पना डोक्यात आली. मी माझ्या बॉटलचा बेल्ट कापून भावाच्या बॉटलला लावला तर? ... परंतू नंतर माझ्या लक्षात आले. या  बॉटलच्या झाकणाला उभी  चीर गेली होती. 

मी  लगेच माझ्या बॉटलचे झाकण काढून त्याच्या बॉटलला लावले. एक प्रश्न मिटला. आता या बॉटलचा बेल्ट काढून तीला जोडायचा होता.  , दुसरीला जोडतांना हुकातून बेल्ट व्यवस्थित काढून मला सुई दोऱ्याने त्याला पुन्हा टाचावे लागणार होते. यासाठी मला आईची मदत लागणार होती. निदान एक बॉटल तरी वापरात येईल या आशेने आईनेही लगेच मदत केली.

माझा आनंद गगनात मावेनासा झाला. उत्साहात मी वॉटर बॉटल भरली आणि खांद्याला अडकवली. पाण्याचे ओझे बॉटलला पेलवत नाही हे लक्षात येवून मी लगेच खालच्या बाजूने बॉटलला आधार दिला. तिच्या छोट्या नळीतून मी बराच वेळ पाणी पीत बसले होते. 

हि बॉटल नव्यासारखी नक्कीच नव्हती परंतू माझे काम भागणार होते. उद्याची स्वप्ने रंगवत मीही मग दुसऱ्या उद्योगांना लागले. खेळून घरी परतल्यावर भावाने दुरुस्त केलेली बॉटल बघितली आणि त्याचे मन बदलले. आमची वादावादी सुरू झाली. परंतू तो ऐकायला तयार नव्हता. मला फारच हतबल वाटू लागले. मीही जीवाच्या आकांताने माझी बाजू मांडू लागले. आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही. आता  बाहेरून आल्यावर त्यातून पाणी पीत तो मला सांगू पहात होता की ती बॉटल त्याचीच आहे.  बराच वेळ तो ती बॉटल जवळ घेवून बसला होता.  आपली फसवणूक झाली असे वाटून मी दुःखी  झाले होते. 

संध्याकाळी वडील आले. एक वॉटर बॉटल उत्तम स्थितीत बघून त्यांना हायसे वाटले. आईने त्यांना सगळे सविस्तर सांगितले. आम्ही बेल्ट कसा जोडला आहे ते बघण्यासाठी वडीलांनी ती बॉटल उचलली आणि पाण्याचे काही थेंब गळायला लागले. बॉटल कुठून गळते आहे हे काही कळले नाही. तरी बॉटल गळत होती हे बघून वडिलांनी तीला पुन्हा पाण्याने पूर्ण भरले. आता त्या पाण्याच्या ओझ्याने तिच्या एका बाजूने टाचलेला बेल्ट तुटला. तिने हवेतच एक जोरात हिंदोळा खाल्ला. वडिलांनी तीला लगेच हातात धरले,"  बेल्ट फारच नाजूक आहे.... यामुळेच बहुदा सकाळी या  हातातून  खाली पडल्या" अशी टिप्पणी केली. बॉटल गळण्याचा वेग फार नसल्याने कुठून गळते आहे हे लक्षात येत नव्हते. अखेर कंटाळून वडिलांनी ती बॉटल खिडकीत ठेवून दिली. वडिल आम्हाला उद्देशून  रागाने बोलले," आता शेवटचे सांगतो या बॉटलसाठी तुम्ही पुन्हा भांडणे केलीत तर तुम्हा दोघांनाही दणके देईल. आपापल्या कामाला लागा. या बॉटल मधील पाण्याची पातळी कमी झाली तर बॉटल गळते आहे हे निश्चित.  दोन्ही बॉटलचे पैसे वाया गेल्यातच जमा आहेत. आता आणखी भांडणे नकोत. इथून पुढे मला कोणतीही वस्तू घेण्याचा आग्रह करायचा नाही. राहील लक्षात....." माझ्या भावा कडे बघून वडील बोलले," तू रे.... सकाळी तर तुझी बॉटल ठीक होती. तिचा बेल्ट कसा तुटला. " 

तसा भाऊ आपण कसे निर्दोष आहोत हे सांगू लागला," पप्पा मी वर्गात पोहचलो तेव्हा तिचा एकिकडचा बेल्ट तुटून हातात आला. मग मी घाईतच तीला बेंचवर ठेवले. थोड्या वेळात माझ्या मित्राचे दप्तर ओले झाले म्हणून त्याने मला बॉटल उचलायला सांगितली. मग आम्ही दोघांनी  वॉटर बॉटलचे पाणी पिऊन संपविले. बेल्ट गाठ मारून जोडला.  रिकामी बॉटल दप्तरात ठेवून दिली. मला नाही माहित बॉटल गळायला कशी लागली? तिचा बेल्ट कसा तुटला.?" 

त्यावर वडील थोडे खजील होत बोलले," सकाळीच पडली तेव्हा तिलाही मार बसला असणार. तेव्हा आपल्या लक्षात आले नाही. तुझी आणि मित्राची वह्या पुस्तके तर खराब झाली नाहीत ना?" 

त्यावर तो बोलला," नाही.... दोघांची वह्या पुस्तके खराब झाली नाहीत . त्याचे दप्तर मात्र एका ठिकाणी थोडे ओले झाले होते. " 

हा सगळा घटना क्रम अतिशय निराशाजनक असल्याने," असू द्या.... आता या वॉटर बॉटलचा नाद सोडून द्या. भांडणे करु नका. आपापल्या कामाला लागा. " 

असे म्हणत त्यांनी हा विषय बंद केला.

आशा इतकी वाईट असते की अनेकदा वास्तवाचे भान विसरून आपण चमत्काराची अपेक्षा करु लागतो. मलाही अशाच चमत्काराची अपेक्षा होती. 'निदान ही वॉटर बॉटल गळू नये' ही अपेक्षा मनात घर करून होतीच. बऱ्याच वेळाने जेव्हा त्या बॉटल कडे लक्ष गेले तेव्हा पाण्याचा एक ओघळ खिडकीच्या कट्या वरून खाली येवून खाली पाणी साठलेले दिसले आणि सगळ्याच भावना अचानक बोथट झाल्या.

जणू काही कधीच मी माझ्या आवडीची वॉटर बॉटल खरेदी केली नव्हती. माझा जीव कधीच तिच्यात गुंतला नव्हता.आशा आविर्भावात मी माझ्या मैत्रिणीकडे खेळायला निघून गेले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार होवून शाळेत गेलो. 

त्यानंतर अनेक वर्षे आम्ही असेच शाळेत जात होतोच. त्या दिवसा नंतर मी मात्र शालेय जीवनात वॉटर बॉटल या संकल्पनेला कधीच भुलले नाही. हा एक अतिशय ताप दायक प्रकार आहे हिच धारणा अनेक वर्षे कायम होती.

आम्ही दोघे माध्यमिक शाळेत असताना आईने मात्र  पुन्हा हौशेने मिल्टनची वॉटर बॉटल घरी आणली होती. त्यात थंड पाणी बराच वेळ थंड रहायचे, झाकण हरवू नये म्हणून झाकणाला बॉटलशी जोडून ठेवणारी बारीक अशी साखळी होती.  मोतिया आणि मरून रंगाची भरपूर पाणी सामावून घेणारी भारदस्त अशी हि बॉटल आमच्या घरात आली तेव्हाही बॉटल एक आणि आम्ही तिघे असा पेच पडला होताच. यावर उपाय म्हणून आईने आठवड्याचे शाळेचे दिवस आमचा तिघांमध्ये वाटून दिले होते. भाऊ त्याच्या पहिल्याच दिवशी वॉटर बॉटल शाळेच्या स्टेडियमवर विसरून आला.  नशिबाने हि वॉटर बॉटल आधी माझ्या बहिणीकडे बघितलेल्यांनी  तीला ती नेऊन दिली.  भावाचा दिवस असतांना तो रिकाम्या हाताने परतला तेव्हा आईला फारच घोर लागला होता. थोड्याच वेळात मात्र बहिणीने  ती वॉटर बॉटल  तिच्या सोबत घरी आणली होती. आईला तिखट मीठ लावून घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यामुळे त्याचा नंबर या यादीतून कायमचा वगळण्यात आला होता. या सगळ्या प्रकारात रोज लागणाऱ्या तहानेला दोन दिवस मिळणारे घरचे थंड पाणी कसे पूरेल? हा प्रश्न मला पडला होताच. त्यात भावाला आईचा मिळालेला ओरडा बघता, शाळेचा नळ आणि हाताची ओंजळ हीच उत्तम सोय आहे हे माझ्या मनात पक्के झाले.

 वॉटर बॉटलही गरज असण्यापेक्षा जबाबदारीच अधिक होती.

नळ, हापसा, पाणपोई असे अनेक प्रकार उपलब्ध असतांना उगाच खांद्याला वॉटर बॉटलचे ओझे नको या विचाराने मी स्वतः आईच्या वॉटर बॉटल दिवसाच्या त्या यादीतून माझे नाव मागे घेतले होते. रिकाम्या वॉटर बॉटलचे ओझे इतके होते की ताईनेही काही दिवसातच त्या यादीत न रहाणे पसंत केले.

आता या वॉटर बॉटलचा वापर परीक्षेला जातांना, सहीलीला, प्रवासाला जातांना होवू लागला. बाकी वेळ हि वॉटर बॉटल घरीच असे. त्यामुळे तिचा लळा असा लागलाच नाही.  

हल्ली मात्र मी माझ्या लेकासाठी वॉटर बॉटल घेतांना त्याची पसंती, बॉटलचा टिकाऊपणा, माझे बजेट या सगळया कसोट्यांवर योग्य असणाऱ्या वॉटर बॉटलचीच निवड करण्याचा  प्रामाणिक प्रयत्न करते. प्रत्यक्षात मात्र लेकाच्या पसंतीच्या अनेक वॉटर बॉटल खरेदी करून त्यांच्या वापरानंतर लक्षात आलेल्या त्रुटींमुळे घरात पडून राहतात. आता शाळेत पिण्याच्या पाण्याचे नळ नाहीत. हापासा सहज डोळ्याने दिसत नाही. त्यावर मोटर बसवून वरच्या टाकीत पाणी चढविले जाते. हाताच्या ओंजळीने पाणी पिणे अगदीच संस्कार बाह्य समजले जाते. अशा परिस्थितीत लेकाचा पुन्हा नवीन वॉटर बॉटलचा शोध सूरू होतो आणि मीही मग त्या शोधाचा एक भाग होवून जाते.

एक मात्र ध्यानात आले आहे की, पिढी बदलत गेल्या तरी कुठलीच वॉटर बॉटल परफेक्ट नसते आणि परफेक्ट असणारी बॉटल ही आपल्या पसंतीची वॉटर बॉटल कधीच होऊ शकत नाही.  तसेच या वॉटर बॉटल खरेदी नंतर पालकांना तरी समाधान मिळते किंवा पाल्याला तरी आनंद अनुभवता येतो. इथे एकाच दगडात दोन पक्षी मारता येत नाहीत. तात्पर्य एकाच खरेदीत दोघांनाही खुश करता येत नाही.

©️ अंजली ममीनानाथ धस्के