होळी आणि रंगपंचमी निमीत्त रांगोळ्या २०२१

#DIY #Holi #festival #Rangoli #होळी_प्रदीपन निमित्त अत्यंत  #सुंदर #रांगोळी
होळीला रांगोळी काय काढावी हे सुचत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. काढण्यास अत्यंत सोपी अशी ही रांगोळी तुम्हाला नक्की आवडेल

होलिका दहन 

Simple and beautiful Rangoli for Holi Festival
https://youtu.be/-FX0cpgYBb8

Few more rangolis for Holi festival

आपला #अभिप्राय #लाईक #like #comment #कॉमेंट रूपाने जरूर कळवा. हा व्हिडिओ आपल्या नातेवाईक आणि मित्र मंडळी सोबत #शेयर #share करायला विसरू नका. 
अधिक व्हिडिओ साठी #Rang_Majha_Vegala_by_Anjali_M 
हे YouTube Channel #subscribe करून #notification मिळवण्यासाठी #Bell_icon चे #बटन दाबायला विसरू नका. आपला सकारात्मक प्रतिसाद हिच प्रेरणा आहे तेव्हा सगळ्यांनी चॅनल subscribe करा ,  जास्तीत जास्त लाईक कॉमेंट आणि शेअर करा.
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे )



होलिकादहन रांगोळी



रंगपंचमी रांगोळी




 

ईश्वरी.... एक स्त्री मन


#ईश्वरी_एक_स्त्री_मन
©️ अंजली मीनानाथ धस्के 

           जागतिक महिला दिनानिमित्त सावित्री बाई फुले महाविद्यालयात डॉ. ईश्वरी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार होता.

            ईश्वरीची आई आता खूप थकली होती. तिला ईश्वरीचा खूप अभिमान होता.  ईश्वरीला आता कोणत्याही आधाराची गरज नव्हती. ती स्वतः आता अनेकांचा आधार बनली होती. 

      आज पर्यंत अनेक सत्कार समारंभ अनुभवलेल्या ईश्वरीला आज मात्र हा सत्कार घेतांना गहिवरून येत होते. ईश्वरीचा सत्कार झाला. तिने विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी स्वतःचे काही अनुभव सांगावे अशी तिला विनंती करण्यात आली. 

 क्षणात तिचे मन भूतकाळात गेले......
           घरात सगळी सुखे हात जोडून उभी होती. लग्नाला तेरा वर्षे होवूनही मुल बाळ नाही म्हणून सुभेदार कुटुंब दुःखी होते. अनेक नवस करून झाले होते. अखेर घरात पाळणा हलण्याची चाहूल लागली. संपूर्ण घर आनंदून गेले. सुभेदारांच्या घराचा वारस जन्माला आला. उशिरा का होईना परंतु मुलगा झाला म्हणून बाळाचे स्वागत अगदी धुमधडाक्यात झाले होते. 

          आजी आजोबा नातवाचे तोंड पाहून तृप्त झाले होते.  वंशाला दिवा मिळाला म्हणून बाळाचे नाव "दिपक" ठेवले. घरातले सगळेच दिपकच्या संगोपणाकडे  विशेष लक्ष देत. आई आणि बाबा दोघेही  क्रांतीज्योत सावित्री बाई फुले महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. घरात मुल होत नव्हते तोपर्यंत आई आणि आजीला अनेकदा सामाजिक समारंभात कमीपणा घ्यावा लागला होता. दिपकच्या येण्याने त्याची भरपाई झाली होती. 
           आई दिपकच्या खाण्यापिण्याची, त्याच्यावर उत्तम संस्कार व्हावे यासाठी खास काळजी घेत होती. बाबा दिपकला अनेक बोध कथा वाचून दाखवत. दिपकशिवाय आजी आजोबांना तर एक क्षणही करमत नव्हते. दिपक त्याच्या आईप्रमाणे हळवा होता. शाळेत जाण्याचे वय झाले तेव्हा दिपकसाठी शहरातल्या सर्वात उत्तम शाळेची निवड करण्यात आली. दिपकचे बालपण अगदी लाडाकोडात जात होते. दृष्ट लागू नये असेच सारे घडत होते. दिपक अभ्यासातही हुशार होता.
        हळूहळू दिपक वयात येवू लागला तसे शारीरिक बदलांमुळे त्याची मानसिक घुसमट होवू लागली. इतर मुलांसारखे वागणे त्याला जड जावू लागले. त्याचे त्यालाच कळत नव्हते की, नेमके शरीर बदलते आहे की मन बदलते आहे. त्याच्या वयाच्या मुलांना मुलींबद्दल आकर्षण वाटत असे पण दिपकला मुलीसारखे राहण्याचे आकर्षण वाटू लागले होते. एकदा त्याने घरी कोणी नसतांना आईसारखा ओठांना हलका गुलाबी रंग लावला. डोळ्यात काजळ घातले. खांद्यावर आईची गुलाबी रंगाची चंदेरी ओढणी घेतली. कपाळावर चंद्रकोर टिकली लावली. कानात  मोत्याचे डूल घातले. आरशात स्वतःला असे नाजूक नटलेल्या रुपात बघून त्याला खूप आनंद झाला. रोजच्यापेक्षा त्याला त्याचे हेच रूप अधिक भावले.
                  मंदिरातून लवकर घरी आलेल्या आजीने त्याला अशा आवतरात बघितले. क्षणभर तर तिने त्या नाजूक रुपाकडे बघुन ओळखलेच नाही की, 'ती नाजुक दिसणारी मुलगी' म्हणजेच दिपक आहे. परंतू जेव्हा आजीच्या लक्षात आले तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली. रागाने  काहीच न सुचून तीने दिपकला बाथरूममधे नेवून त्याच्या अंगावर थंड पाण्याच्या बादल्या ओतल्या. दिपकच्या आई वडिलांच्या कानावर झालेला प्रकार घातला. त्या दिवसापासून सगळ्यांच्या वागण्यात बदल झाला. दिपक इतर मुलांच्या संगतीमुळे तसेच टीव्हीवरील कार्यक्रमांमुळे बिघडतो आहे असे वाटून आई बाबांनी त्याचे शाळेव्यातिरिक्त बाहेर पडणे आणि टिव्ही बघणे बंद केले. 
           
      आईसारखे साधी लिपस्टिक आणि काजळ तर लावले होते. मग घरात सगळ्यांचे वागणे येवढे का बदलले ?.... अशा प्रश्न दिपकच्या बाल मनात घर करुन होता. 
            घरात सगळेच उच्च शिक्षित होते पण कोणालाही दिपकची घुसमट कळत नव्हती. काही दिवसांनी सगळं पूर्ववत होईल अशीच आशा सगळे बाळगून होते. 

        घरच्या वातावरणात काहीच बदलले नाही, सगळे पूर्वीसारखे आहे.  हे दिपकला भासावण्याचा केविलवाणा प्रयत्न घरात एकटी आईच करत होती.
             एके दिवशी घरी पाहुणे आले. सगळ्यांच्या गप्पा रंगात आल्या. तेवढ्यात कोणीतरी दिपकला विचारले," तुला मोठे झाल्यावर काय बनायचे आहे?" त्यावर दिपकने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले," मला आई बनायचे आहे". 
सगळी वातावरणात निःशब्द शांतता पसरली. त्यावर वडिल सावरासावर करत बोलले, " त्याची आई उत्तम प्राध्यापिका आहे तिच्या सारखेच त्यालाही उत्तम प्राध्यापक बनायचे आहे म्हणून तो म्हणतो आहे की आई बनायचे आहे." त्यांचे हे स्पष्टीकरण दिपकला मुळीच रुचले नाही पण घरी आलेल्या पाहुण्यांना मात्र ते पटले आणि त्यांच्या पूर्ववत गप्पा गोष्टी सुरू झाल्या. पाहुणे गेल्यावर  दिपकला बाबा खूप रागावले. आईने मात्र प्रेमाने कुशीत घेतले. आपले काय चुकते आहे हे दिपकला कळतच नव्हते . दिपकला आणि घरच्यांना कसे समजावून सांगावे हे आईला कळत नव्हते.
         आईने दिपकच्या वागण्याचा, मानसिकतेचा अभ्यास केला. त्यावर उपलब्ध असलेली सर्व शास्त्रीय माहिती वाचून काढली. त्याबाबत तज्ञ मंडळीशी चर्चा केली. त्यातून तिला जे काही कळले ते पचविणे तिच्यासाठी जेवढे कठीण होते त्यापेक्षाही घरच्यांना ते पटवून देणे महाकठीण होते. जिथे सामान्य माणसे एकमेकांना समजून घ्यायला कमी पडतात तिथे पुरुषाच्या देहातील 'स्त्री मनाला' कसे समजून घेतील? हा प्रश्न आईला सतावत होता. तरी तिने दिपकसाठी ते आव्हान स्वीकारले. घरच्यांना तज्ञ मंडळीकडून समजावून सांगितले. सत्य परिस्थिती स्वीकारून त्यातून योग्य भविष्याकडे वाटचाल करण्याचा तिचा प्रयत्न होता.
         आजी, आजोबा आणि बाबा यांना सत्य काय आहे हे समजले तेव्हा ते स्वीकारण्याची त्यांची मानसिकता नव्हती. दिपकचे सत्य घरातल्यांनी नाकारले तर बाहेरच्यांनी  त्याचे भांडवल करायला सुरुवात केली.  त्यातूनच दिपक आणि त्याच्या आईच्या वाट्याला खूप मोठा संघर्ष आला.
          दिपकशी पूर्वी साधेपणाने वागणारी त्याची मित्र मंडळी आता त्याची टिंगल टवाळी करू लागली. समाजात वावरतांना त्याला सुरक्षित वाटत नव्हते. बालपणीसारखे मुलांमध्ये मिसळले तर त्यातील एखादा टारगट मुद्दामहून नको ते अचकट विचकट बोलत होता. नको तितकी लगट करू पहात होता. त्याच्या या अवस्थेमुळे मुलीही त्याला मित्र किंवा मैत्रीण म्हणून स्विकारायला धजत नव्हत्या.  
      त्याच्या आयुष्यात त्याने ज्याच्याजवळ मन मोकळे करावे असे त्याच्या वयाचे कोणीच नव्हते. तो एकाकी पडला होता. आधी आजी आजोबा, बाबा दिपकला सगळीकडे आनंदाने घेवून फिरायचे पण आता मात्र त्याला महाविद्यालयाच्या प्रवेशासाठीही बाबा सोबत करायला तयार नव्हते. दिपक मात्र मन मारून बाबांना आवडेल असे वागण्याचा प्रयत्न करत होता. जे प्रत्यक्षात नाही ते दाखविण्यात त्याचा जीव मेटाकुटीला येत होता. आईला त्याची घुसमट समजत होती.  त्याच्या 'स्त्री मनाला' तो शरीराने एक पुरुष आहे हे समजत असूनही तसे वागणे फार जड जात होते. 
       समाज जणू फक्त स्त्री आणि पुरूष अशा दोनच विभागात विभागलेला होता. समाजाच्या दृष्टीने दिपक सारख्यांना फारसे अस्तित्वच नव्हते. जिथे अस्तित्व नाकारले जाते तिथे आदर, प्रेम व अधिकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. 
  शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर  दिपकला सुरक्षित वाटावे, त्याच्या शिक्षणात अडचणी येवू नये म्हणून आईने त्याला स्वतःच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला.
        येवढे होऊनही दिपक अभ्यासात हुशार होता. यामूळे वर्गातील काही मुले त्याचा दुस्वास करायची. आता प्राध्यापक म्हणून काम करतांना त्याच्या आईच्याही अडचणी वाढल्या होत्या.   
         दिपक सारख्यांना सामान्य मुलांच्या बरोबरीने शिक्षण देण्यात येवू नये. त्याने त्याच्या ' किंन्नर' समाजात जावून रहावे. त्यांच्या सारख्यांसाठी जे अलिखित नियम लिहून दिले आहेत त्यांचे पालन करावे. असेच समाजातील अनेकांना वाटत होते.
       दिपकने आता किन्नर समाजाच्या रितीभाती शिकून घ्याव्या. आईजवळ न राहता किन्नर समाजात रहावे. यासाठी किंन्नर समाजाकडून दिपकच्या घरच्यांवरही प्रचंड दबाव येत होता. या सगळ्याला कंटाळून आजीआजोबा गावाकडच्या घरी राहायला गेले. समाजात दिपकमुळे होणारी मानहानी वडिलांनाही अजिबात सहन होत नव्हती. वडिलांनीही सेवानिवृत्ती घेवून गावाकडे राहणे पसंत केले. दिपकमुळे त्याच्या आई वडिलांचे संबंधही प्रचंड ताणल्या गेले.
            दिपकने उच्च शिक्षण घ्यावे यासाठी त्याची आई मात्र कायम  प्रयत्नरत होती. आई दिपकने कायम आपल्याजवळ रहावे यासाठी कायद्याची मदत घेवून शक्य ते सगळे प्रयत्न करत होती. इतरांप्रमाणे किन्नर समाजालाही शिक्षण, नोकरीसाठी संधी मिळावी यासाठीही तिचे प्रयत्न सुरू होते. 
      दिपक पदवी शिक्षण घेत असतांना  एक दिवस वर्गातल्या काही टारगट मुलांनी त्याला एकट्यात गाठून त्याच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याला शोधत त्याची आई तिथे वेळेत पोहचली आणि पुढचा अती प्रसंग टाळल्या गेला. या प्रसंगाने तर दिपक फारच घाबरून गेला होता. आईला मात्र वेगळ्याच जाणिवेने भेडसावले होते. दिपकचे मन स्त्रीचे असून शरीर पुरुषाचे आहे. तो मन मारून पुरुष वेश परिधान करत करतो. सद्यपरिस्थितीत  तो मुलाच्या वेशात असला तरी विक्षिप्त वासनेच्या नजरा त्याला त्रास देतातच.  दुहेरी घुसमट सहन करण्यापेक्षा आता दिपकला त्यांची नैसर्गिक ओळख मिळाली आहे त्याचा आपण सन्मान करायला हवा. तो जसा आहे तसाच त्याला स्विकारण्याची गरज आहे. त्याला इतर मुलांप्रमाणेच सामान्य वागणूक मिळावी असे वाटत असेल तर आधी त्याला इतरांप्रमाणेच आत्मविश्वास पुर्ण जीवन मिळवायला हवे. तरच समाजातील इतर घटक त्याचे 'असे विशेष' असणे सहज स्विकारतील. त्याला सन्मान देतील. या निषकर्षापर्यंत अखेर ती पोहचली होती. तिच्यासाठीही हा प्रवास खडतर होता. 
       या एका कठीण प्रसंगाने आईच्या विचारांना दिशा मिळाली आणि तिच्या या  विचारांनी तिने दिपकलाही प्रेरित केले. आईने सगळ्यात आधी कायद्याने  दिपकचे नाव बदलून ' ईश्वरी ' असे करून घेतले. ईश्वरी या नावाने दिपकच्या मनात अनेक वर्षे कोंडमारा सहन करणाऱ्या 'स्त्री मनाला' नवी ओळख  मिळाली होती. आईने विश्वासाने उचललेल्या या धाडसी पाऊलाचे..... आईच्या कष्टाचे चीज करण्याचा ध्यास ईश्वरीनेही घेतला. लिंग, जात , धर्म यापलीकडे जावून निव्वळ बुद्धीच्या सामर्थ्यावर   वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीने ईश्वरी पेटून उठली. 
       पुन्हा एकदा ईश्वरीला अनेकांच्या बोचऱ्या नजरांना नव्याने सामोरे जावे लागले. पण या वेळी ती खचली नाही. तिने स्वरक्षणाचे प्रशिक्षण घेतले. वयात येताना आपल्या मनाची जशी घुसमट झाली तशी घुसमट इतर कोणत्याही मनाची होवू नये या भावनेने तिने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मानसशास्त्र या विषयाची निवड केली. अडचणी येत होत्या पण आता माय लेकिनी मागे फिरून न पाहण्याचा निर्णय घेतला.
ईश्वरीने  मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. येवढे करून कोणतीही चांगली शिक्षणं संस्था तिला नोकरी देण्यास उत्सुक नव्हती. नोकरी मिळत नाही म्हणून खचून न जाता तिने संशोधनासाठी परदेशातील विद्यापीठात प्रवेश व शिष्यवृत्ती मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. मानसिक स्तरावर विशेष असणार्‍या मुलांची आणि त्यांच्या पालकांची मानसिकता अभ्यासण्यासाठी तीला 'इंडियाना विद्यापीठात'  शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळाला. हे संशोधन पुर्ण करून भारतात परतल्यावर तिने ' आईची माया ' ही सेवाभावी संस्था स्थापन केली. किन्नर समाजातील शिकलेल्या लोकांची मदत घेत मानसिकरित्या विशेष मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तिने एक शाळा सुरू केली. शाळेत विशेष मुलांना त्यांच्या  आवडीप्रमाणे शिक्षण दिल्या जाते. त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न केला जातो. विशेष मुलांच्या पालकांनाही विशेष मार्गदर्शन दिले जाते. या संस्थेला मिळणाऱ्या उत्पन्नातून काही भाग हा किन्नर समाजातील ज्यांनाही पुढे शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येतो. यामुळेच  तिच्या कार्याने प्रभावित होऊन किन्नर समाजाचाही तिला पाठींबा मिळू लागला. शिकलेल्या किन्नर व्यक्तीला  त्याच्या योग्यतेप्रमाणे नोकरी करता यावी यासाठी तीने प्रशासना विरोधातही लढा दिला. 
        विशेष मुलांच्या पालकांना योग्य समुपदेशन मिळाल्याने आपले मुलंही भविष्यात आत्मनिर्भर बनू शकते हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला. समाजाने नाकारलेल्याची भावना घेवून जगण्यापेक्षा समाजातील गरजू लोकांना मदत करण्याची दिशा तिने किन्नर समाजातील अनेकांना दिली.  प्रशासनालाही तिच्या कार्याची दखल घेणे भाग पडले.  इतर सेवाभावी संस्थानी तिचा सत्कार केला. किन्नर समाजातील अनेक बुद्धिजीवी मुला मुलींना तिने उत्तम शिक्षण मिळविण्यासाठी प्रेरीत केले. ईश्वरीला नैसर्गिकरित्या आई होणे कठीण होते. या जीवन प्रवासादरम्यान 
'आईपण ही भावना शरीराशी निगडीत नसून मनाशी निगडीत आहे ' याची तिला अनुभूती येत गेली. मनाने ती अनेकांची आई होतीच परंतू कायद्यानेही तिने चार मुलामुलींना दत्तक घेतले. अखेर तिच्या आईसारखीच आई होण्याचे तिचे स्वप्न  पूर्ण झाले होते. 
           डोक्यात अनेक आठवणी जाग्या होत असतांना तिने योग्य शब्दांची जुळवाजुळव करत भाषणाला सुरूवात केली. तिच्या बुध्दीच्या विकासासाठी तिच्यावर बालपणी झालेले संस्कार किती महत्त्वाचे होते हे तिने मोजक्या परंतू प्रभावी शब्दात सांगितले. तिला मिळालेले मान चिन्ह शेजारीच बसलेल्या तीच्या आईच्या हातात दिले. तिच्या यशामध्ये तीच्या आईचा सिंहाचा वाटा आहे, हे सांगायला ती विसरली नाही. भाषण संपले तसे टाळ्यांचा कडकडाट झाला. 
       संघर्ष करतांना अनेकदा माय लेकीचे डोळे पाणावले होते. आज मात्र  माय लेकीच्या डोळ्यात  दाटलेले अश्रू आनंदाचे होते. 
       आज इतक्या वर्षांच्या  संघर्षानंतर ईश्वरीच्या कार्याने इतर विद्यार्थ्यांनीही प्रेरणा घ्यावी या भावनेने ज्या महाविद्यालयातून  इश्वरीची आई सेवा निवृत्त झाली होती, शिक्षण घेत असतांना हिडीस मानसिकतेला बळी पडलेल्या मुलांनी ईश्वरीवर अती प्रसंग ओढावला होता, त्याच क्रांतीज्योत सावित्री बाई फुले महाविद्यालयात ईश्वरीला प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले होते. या महाविद्यालयात विषेश मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. त्या अभ्यासक्रमासाठी अध्यापक म्हणून निवड करतांना कोणताही भेद न बाळगता केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर किन्नर समाजातील काही शिक्षकांची निवडही  करण्यात आली होती. 
      या कार्यक्रमाचे सोशल मीडियावर  होणारे प्रसारण गावी असलेले तिचे वडील बघत असतांना अपराधी भावनेने अगतिक झाले होते. जागतिक महिला दिनानिमित्त ईश्वरीचा झालेला हा सत्कार म्हणजे आपल्या लेकराच्या पाठीशी  खंबीरपणे उभे राहणाऱ्या आईच्या संघर्षाला आलेले घवघवीत यश तर होताच परंतू ईश्वरीच्या पुरूषी शरीराचे स्थान अखेर नगण्य करत तीच्या स्त्री मनाचा समाजाने स्वीकार केला आहे याची पावतीही होता. तीच्या सारख्या स्त्री मनाच्या मुलांना  समाज रचनेत मानाचे स्थान मिळण्याची ही तर खरी सुरवात होती. 

 ©️ अंजली मीनानाथ धस्के

टिपः लिखाण आवडल्यास शेअर करताना नावासहित करावे. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

सदर कथा कल्पनिकआहे. स्त्री किंवा पुरुष अशा वर्गात न मोडता येणाऱ्या तृतीय पंथा बद्दल कोणताही भेद न बाळगता त्यांना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न देता त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांनी आत्मविश्वासाने वाटचाल करावी यासाठी प्रयत्नशील रहावे. कुटुंबाने व समाजानेही  त्याचा स्वीकार करत  सन्मानाने जगण्याचा त्यांचा अधिकार अबाधित ठेवावा.  हेच या कथेतून आपणाला सुचवू इच्छिते. काही चुकल्यास माफी असावी.


गजानन महाराज प्रकट दिन निमित्त अत्यंत सुंदर दोन रांगोळ्या

 #DIY #Gajanan_Maharaj #Rangoli #गजानन_महाराज #प्रकट_दिन निमित्त अत्यंत  #सुंदर #Jay_Gajanan  गजानन महाराजांची  #रांगोळी  खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे 👇👇👇👇

https://youtu.be/QoR3ttbZpJI


"गण गण गणात बोते" ही  सुंदर रांगोळी खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे 👇👇👇

https://youtu.be/JmjSDjYV5C8

आपल्याला हा #व्हिडीओ आवडल्यास #Rang_Majha_Vegala_by_Anjali_M या YouTube Channel ला👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

 #Subscribe करायला विसरू नका.  हा व्हिडीओ जास्तीत जास्त #Like #comment #share करून आपला #प्रतिसाद नोंदवा.  सोबतच #Notification मिळविण्यासाठी #Bell_icon चे बटण दाबावे

धन्यवाद

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)

रांगोळी क्रमांक १



रांगोळी क्रमांक २




प्रथम क्रमांक विजेती ठिपक्यांची रांगोळी

 प्रथम क्रमांक विजेती ठिपक्यांची रांगोळी 

मी काढलेल्या या  रांगोळीने ठिपक्यांच्या  रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला . आपल्या शुभेच्छा मुळेच हे शक्य झाले आहे. 

मनस्वी आभार 

(C) ANJALI  MINANATH DHASKE 



मकर संक्रांत आणिहलव्याच्यादागिन्यांची रांगोळी२०२१

 आपणास मकर संक्रातीच्या  हार्दिक शुभेच्छा.....

तीळ गुळ घ्या गोड गोड बोला....

आपला प्रतिसाद असाच पाठीशी असू द्या.

लवकर चॅनल subscribe करा आणि केले असेल तर मित्र मंडळी यांना जास्तीत जास्त शेयर करायला विसरू नका

#मकर_संक्रांत निमित्त घेवून येत आहे काढायला अगदी सोपी आणि दिसायला अत्यंत आकर्षक अशी रांगोळी.

संपुर्ण व्हिडियो पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/PFTIeaKKPnA

#Best for #Haldi #Kumkum #ceremony

व्हिडियो आवडल्यास #like #Comment आणि #share करायला विसरू नका.

Rang Majha Vegala by Anjali M 👇👇👇👇👇

https://www.youtube.com//UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

हे YouTube Channel #Subscribe करायला विसरू नका. सोबतच

notification मिळवण्यासाठी Bell icon चे बटन दाबा.

©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे )

रांगोळी क्रमांक 1



#मकर_संक्रांत निमित्त घेवून येत आहे काढायला अगदी #सोपी आणि दिसायला अत्यंत #आकर्षक अशी #पैठणी_साडी  आणि  #हलव्याचे_दागिने असलेली  #रांगोळी.
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
बोरन्हाण , हळदी कुंकू समारंभ  या साठी  उपायुक्त  अशी ही रांगोळी तुम्हीही नक्की काढून बघा. 
व्हिडियो आवडल्यास #like #Comment आणि #share करायला विसरू नका.
Rang Majha Vegala by Anjali M हे YouTube Channel👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
 #Subscribe करायला विसरू नका. सोबतच notification मिळवण्यासाठी Bell icon चे बटन दाबा.
©️ अंजली मीनानाथ धस्के ( एलगीरे )

रांगोळी क्रमांक 2




एक पाऊल... पुढे

 

 #एक_पाऊल_पुढे

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)

फार पूर्वी मुलाला कडेवर घेवून कुठे गेले की काही वयस्कर महिला मंडळी  मला पहिला प्रश्न विचारायच्या, "आता याला बहीण कधी आणणार?" 

आणि ज्या स्त्री च्या कडेवर मुलगी आहे तिला पहिला प्रश्न" आता हिला भाऊ कधी आणणार?"

त्यावर साहजिकच मी," दुसऱ्यांदा त्याला बहीणच होईल कशावरून? तूम्ही खात्री देत असाल तरच सेकंड चान्स घेते... बोला कधी घेवू." त्यावर समोरची व्यक्ती " मी कशी खात्री देणार पण भावाला बहिण हवीच "

त्यावर मीही ," भावाला बहिण.... बहिणीला भाऊ हवाच ... मान्य आहे पण दुसरा चान्स घेवूनही भावाला बहिण किंवा बहिणीला भाऊ झाला नाही तर मग तिसरा चान्स घ्यायचा का?"

त्यावर समोरची व्यक्ती सावरासावर करत म्हणणार ," तुला काय ग... दुसरा मुलगा झाला तरी भावाला भाऊ होईल .... एकाला दोघे कधीही चांगलेच " 

जिच्या कडेवर मुलगी आहे ती स्त्री हा संवाद निमूट ऐकून तरी  घेई नाहीतर "हल्ली मुली कोणत्याच बाबतीत मुलांपेक्षा कमी नाहीत" .. किंवा " मला तर दुसरीही मुलगीच हवी ... मुली आई वडिलांना जीव लावतात.  मुलाचे कितीही करा म्हातारंपणी खरा आधार मुलींचं देतात" इत्यादी वाक्य ऐकवे सगळ्यांना.

      मुलगी झाल्यावर घरातूनच तिला जे ऐकून घ्यावं लागतं त्याचा परिणाम म्हणून मग ती तिचे विचार असे परखडपणे मांडत असावी असा माझा समज.

         तुमच्या कडेवर मुलगा असो की मुलगी समाजकंटकांना तुम्हाला सल्ला हा द्यायचाच असतो .... तूम्ही तो किती मनावर घेता यावर तुमची प्रतिक्रिया ठरते.

माझ्या बालपणी घरात.. समाजात मी स्वतः मुलगा मुलगी भेद अनुभवला आहे. तेव्हा तो सगळ्याच घरात बघायला मिळायचा. त्यातून आमची आई मुलगा मुलगी भेद निसर्गाने केले तेवढेच पाळणारी व आमच्या पाठीशी कायम ठाम उभी राहणारी.   त्यामूळे आमच्या घरात प्रखर भेदभाव नव्हता. त्यामुळेच की काय मी या भेदभावाचे फारसे मनावर घेतले नाही.

 आजही अनेक नावाजलेल्या कुटुंबात मुलगा वंशाचा दिवा कितीही कर्तुत्व शून्य असो सगळे आर्थिक व्यवहार डोळे झाकून त्याच्या हवाली केले जातात आणि कर्तृत्ववान  मुलींना डावललं जातं हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. 

 स्त्रियांच्या मनातही  आपल्याला मुलगा झाला तर समाजात मान वाढतो हा गैरसमाज अनेक वर्ष पुरुष प्रधान संस्कृतीतून जन्माला आला असावा.

हल्ली मुलगा मुलगी भेद नही दो के आगे एक नही....

असं असलं तरी मुली ' च' कशा मुलांपेक्षा सरस हे वारंवार बिंबवल जातं.

याचाच परिणाम म्हणून .... 

महिलांच्या गटात बोलायला गेलं तर मुलांच्या खाण्यापिण्यापासून अभ्यासापर्यंत कोणताही विषय काढा मुलगी असणाऱ्यांची आणि मुलगा असणाऱ्यांची जणू चढाओढ लागलेली असते.

   माझ्या मैत्रिणीला दोन्ही मुलं असल्याने अशा प्रसंगी तिला खास ऐकून घ्यावं लागतं," काय ग बाई .. तुला दुसरा ही मुलगा ' च ' झाला ..... मुलगी व्हायला हवी होती.... मुलगी लक्ष्मी असते... तिच्या असण्याने घर कसं भरल्यासारखं वाटतं". 

मला ही बोलतात तुला संधी होती तू विचार करायला हवा होता. त्यावर हल्ली  मी सांगते ," जाऊद्या नशिबात जे असेल तेच होत. " ( वयोमानानूसार मी नमत घ्यायला शिकले बहुदा)

या उलट माझी मैत्रीण जिद्दीला पेटून तिचे मत मांडत असते .

असेच एकदा ती खूप वैतागली होती.... मी तिला शांत करण्यासाठी माझ्या घरी घेवून आले . तिला समजावण्यासाठी सहज बोलून गेले ," जाऊ दे न... त्यांच्या बोलण्याने आपला संसार चालतो का??? मग त्यांचे बोलणे का मनावर घेतेस . कशाला अशांच्या तोंडी तोंडी लागते"

त्यावर तिने तिची घुसमट व्यक्त केली.....

मुलगी झाली असती तर कुटुंब पूर्ण झालं असतं .... मुलगी लक्ष्मी असते. . तिच्या असण्याने घराला घरपण येतं .... सगळं मान्य पण .... माझ्या हातात मुलगा दिसतो आहे तरी मुलगीच व्हायला हवी होती असे बोलणारे लोक माझ्या मुलाच्या बाल मनाचा विचार करत नाही . त्याच्या मनात कळत नकळत न्यूनगंडाची भावना रुजवू पाहणाऱ्यांच्या भावनांचा मी का विचार करावा ? मुलगा मुलगी होण आपल्या हातात नाही हे सगळ्यांना माहीत असूनही असे मुर्खासारखे बोलुन आपल्या लहानग्यांना विनाकारण हिनवतात. एक आई म्हणून समानता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मी या बोलण्याला विरोध करणार कारण आपण गप्प बसलो तर समानता येणार नाहीच उलट आधी पुरूष प्रधान संस्कृती होती आणि आता स्त्री प्रधान संस्कृती येईल .... आधी स्त्रिया पीडित होत्या आता पुरूष पीडित राहतील ..... अशाने समानता कधीच येणार नाही .... संघर्ष मात्र कायम राहिलं .... मी हे खपवून घेणार नाही" 

   काय चूक बोलली ती ? .... मुलगी असो की मुलगा .... त्या मागे लोकं ' च' लावतात आणि तिथेच आपल्या सारख्या सामान्यांच्या बुध्दीचा ताबा सुटतो.

हा ' च ' अनेक संवादात मला बोचतो पण इलाज नाही म्हणत मी सोडून दिलं होत.  ज्यांना दोन्ही मुलं किंवा दोन्ही मुली आहेत अशांनी " तुला काय बाई एकच.... त्यातही मुलगा आहे म्हणून तुला आमची वेदना कळणार नाही" असे लेबलही मला लावले.

     काही दिवसापूर्वी आमच्या ओळखीतल्या एकीला मुलगी झाली म्हणून मी भेटायला गेले.... गेल्यावर मी बाळाचे कोडकौतुक करत होते. ते लोभस रूप बघण्यात मी दंग होते. तेवढयात बाळाची आई बोलली ," दुसरीही मुलगी ' च ' हवी होती आम्हाला"

 मी त्या बोलण्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले . माझ्या सोबत असलेल्या काकू सहज बोलून गेल्या  ,"  .... घरात बाळ असल की सगळ्यांना समजत पण किती शांत आहे हे बाळ" त्यावर बाळाची आई लगेच बोलली ," मुली गुणाच्याच असतात. मुली जन्मतः आईचे हीत बघतात. ही पण अजिबात रडत नाही की कसला त्रास देत नाही" वास्तविक हे बोलतांना अत्यानंदाने तिचे लक्ष  तिच्या बाळावर असायला हवे होते पण तिची नजर आजूबाजूला वावरणाऱ्या सासुवर खिळली होती. तिथून पुढे ती आम्हाला अनेक प्रकारे मुली ' च ' कशा गुणी असतात हे सांगत होती. 

    काही दिवस आधी हिच्या मोठ्या मुलीला एकीने सहज विचारलं होत ," तुला भाऊ हवां की बहिण ? " त्यावर मुलीने  "बहिण" हे उत्तर दिले होते तेव्हा ह्याच (बाळाच्या) आईने तिला समजावले होते की "बहिण हवी असे नाही म्हणायचं... तूला राखी  बांधायला भाऊ हवाय न? मग भाऊ हवाय असच सांगायचं . तू जे मागशील तेच देव बाप्पा देणार "

मुलगी झाली आणि आपल्या मुलीच्या न झालेल्या भावाचे समर्थन करू पाहणारी आई अचानक मुली ' च ' कशा पाल्य म्हणून उत्तम असतात याचे धडे आम्हालाच गिरवू लागली.

वास्तविक आम्ही काही तिला दुसरी मुलगी झाली म्हणून हिणवले नव्हते किंवा तसे करण्याचा आमचा काही मानस ही नव्हता पण तिला आलेल्या कटू अनुभवाने तिने सरसगट सगळ्यांनाच तिच्या विरोधी पक्षातले गृहीत धरण्यास सुरवात केली होती हे पाहून वाईट वाटलं.

लेकी बोले सुने लागे.... असं काहीसं सुरू असावं या अंदाजाने आम्ही निपुटपणे काढता पाय घेतला.

      माझ्या एका मैत्रिणीची  दोन्ही मुलं ग्रॅज्युएशन झालेली आहेत तरी तिला  समाजात मिसळत असताना " तुला दोन्ही मुलगेच का ?" असे अजून ऐकून घ्यावे लागते. ती ही आशा वागण्यावर इतकी चिडते पण काही फरक पडत नाही. विचारणारे विचारतातच  

एकदा मुलगा मुलगी भेदभाव यावर चर्चा सुरू असताना

बरेच मुद्दे बोलल्या गेले .... 

हल्ली मुलगी झाली तर तिच्या पावलाचे ठसे उमटवून लक्ष्मी घरात आली असा जंगी सोहळा करतात .... पूर्वी मुलगी झाली तर त्या स्त्रीला खुप छळ सहन करावा लागत होता मग आता सोहळा केला जातो ...  समाज सुधारत जातोय.

दुसरा मुलगाच / मुलगीच असे म्हणून हिणवले जाते ते आधी थांबावायला हवे. याने मुलांच्या/ मुलींच्या मनात न्यनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. 

मुलांनी स्वयंपाक केला तर इतकं काय डोक्यावर घ्यायचं ... गेली कित्येक वर्षे मुली हेच करत होत्या. तेव्हा नाही केलं कोणी कौतुक मग आताच का??? 

आम्हाला मुलगा/ मुलगी झाली तो काय आमचा दोष आहे?

हल्ली बायका मुलींचे फाजील लाड पुरवतात. मुलींना घरातली कामे शिकवत नाही की काही वळण लावत नाही. अवघड आहे भविष्य....

इतरांना विरोधी पक्षातले गृहीत धरूनच प्रत्येक स्त्री स्वतः चा मुद्दा मांडत होती. 

इत्यादी इत्यादी.....

 माझी एक मैत्रीण तर इतकं मार्मिक बोलली की डोळ्यात पाणी आले.... 

      " ज्यांना मुल होत  नसतं त्यांना जावून विचारा त्यांचे दुःख काय आहे.... ज्यांना सहज मुलं होतात त्यांनाच असे भेदभाव सुचतात... "

मला का कुणास ठाऊक वाटून गेले.

मान्य आहे की पूर्वी आणि काही अंशी आताही मुलगी झाली की समाज टोमणे मारून स्त्रीला घायाळ करत असतो. या कृतीला आपण बळी न पडता आपल्या पाल्याची निकोप मानसिकता बनवायची असेल तर आधी आपल्याला आपली मानसिकता निकोप करायला हवी. लिंगभेद अधोरेखित होईल अशा कोणत्याही कृतीचे समर्थन करणे टाळायला हवे.

मुलगी/ मुलगा झाला म्हणून सोहळे करणारे आपण ..... मातृत्वाचा सोहळा करायला कधी शिकणार?

निव्वळ मातृत्वाचा सोहळा करणही समानतेच्या दृष्टीने चुकीचेच आहे.

स्त्रीच्या पोटी बाळ जन्माला जरी येत असलं तरी त्या बाळाच्या आस्तित्वासाठी पुरुष ही गरजेचा नाही का? स्त्री माती आहे तर पुरूष बीज आहे .... माती श्रेष्ठ की बीज या वादात .... रोप चांगले हवे असेल तर दोन्हीं गोष्टी महत्त्वाच्या आहेत असेच उत्तर कोणताही माळी देईल.

मग जे केवळ एकमेकांमुळेच पूर्णत्वाला जावू शकतात अशा स्त्री पुरुषांच्या जन्मावरून लिंग भेदाला सुरवात का करायची?

दोघांमध्ये श्रेष्ठ कोण ही स्पर्धा का लावायची?

..... सोहळा करायचाच असेल तर तो पालकत्वाचा व्हायला हवा. कारण जन्मलेल्या बाळाचे कोणतेही लिंग असू द्या .... पालकत्वाची आव्हाने त्याने कमी होत नाहीत.  " 

या चर्चेत ज्या स्त्रियांना मुलगा मुलगी दोन्हीं असतात (जगाच्या दृष्टीने परिपूर्ण कुटुंब असलेली)  तिच काय ते सुखी असते. 

एकदा शिक्षकाने चौथीतल्या वर्गात  "Save girl child" या विषयावर निबंध लिहायला सांगितला. वर्गातल्या ९९ टक्के मुला मुलींना या विषयावर काय लिहावं हेच कळत नव्हतं. जी गोष्ट त्यांना माहीत नाही किंवा त्यांनी ती अनुभवली नाही  ती गोष्ट शिक्षकाने गरज म्हणून  इतिहासाचे दाखले देऊन समजावून सांगितली . कळत नकळत रुजवू नये ते विचार मुलांच्या बाल मनावर बिंबवल्या गेले. वर्गात असलेली समानतेची भावना मोडकळीस येवून लिंगभेदाची भावना अधोरेखित केल्या गेली.

मुलीच्या जन्माचा सोहळा नक्की करा पण त्या सोहळ्याचे कारण  तिचे  मुलगी असणे येवढेच मर्यादित ठेवू नका. अशाने तुमच्याही कळत नकळत तुम्ही तिला जाणीव करून देत राहाल की समाजात  तिचे अस्तित्व दुय्यम मानले जाते.  ज्या जाणिवेची तिला मुळीच गरज नाही. तिचे विश्व तुम्ही आहात.  समाजाला दाखवायला केलेल्या सोहळ्याने समाजाच्या विचारणारेत फारसा फरक पडणार नाही परंतु आपल्या पाल्याच्या आपण घडवलेल्या व्यक्तिमत्त्वाने  समाज बदल नक्कीच घडून येईल . भावी पिढी ही समाजाचा पाया आहे.  तेव्हा पालकांनी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असायला हवे. 

   सद्य परिस्थितीत पालकांचे विचार पूर्वी इतके बुरसटलेले नक्कीच नाहीत. अनेक पालक ज्यांना एकुलती एक मुलगी आहे असे आपल्या मुलीबद्दल बोलतांना कुठेही ' च ' हा शब्द न वापरता बोलतांना मी बघितले आहेत. त्यांच्या निकोप विचारांनी मला खूप प्रभावित केले आहे. आपल्या पाल्याच्या प्रति आदर असावा किंवा नसावा या दोन्ही भावना केवळ त्याच्या लिंगावर आधारीत कशा असू शकतात? असा साधा प्रश्न कधी कुणाला पडत नसेल का? भविष्यात मुलगा किंवा मुलगी आपल्या पालकांशी  कसे वागतील हे त्यांच्या लिंगावर ठरत नाही तर ते पालकांनी दिलेल्या संस्करावर तसेच पाल्याने पालकांच्या वागणुकीचे केलेल्या निरीक्षणावर अवलंबून असते. संस्कार चुकीचे असले की मुलगा असो की मुलगी आईवडिलांना कोणी प्रेमाने सांभाळत नाही याची जाणीव मला समाजातले काही उदाहरणे बघूनच झाली आहे.

खरंच आपण फक्त आपल्या पुरता मर्यादित विचार करतो . नाण्याची एक बाजू बघूनच आपले हिशोब मांडतो पण लक्षात घ्या नाण्याला दोन बाजू असतात. 

बाळ जन्माला येताना आईला होणाऱ्या वेदनांची तीव्रता आपण बाळाच्या लिंगावर ठरवू शकतो का?? जन्मला आलेले बाळ मुलगा असो की मुलगी त्याच्या संगोपनात येणारी आव्हाने सारख्याच तीव्रतेची असतात तेव्हा सगळ्या पालकांनी आपापसात कुरगोडी करण्यापेक्षा समानतेच्या विचारावर ठाम राहणं गरजेचे आहे.

पूर्वापार चालत आलेली बेटा श्रेष्ठ की बेटी? अशी रस्सी खेच थांबवून.... तीन पायाच्या शर्यतीत जो ताळमेळ लागतो तो बेटा आणि बेटी मध्ये  विकसित केला तर समाजाचे चित्र नक्कीच बदलेल. 

 समाजात परिवर्तन आणायचं असेल तर सुरवात आपल्यापासून करायला हवी. 

मेरी बेटी मेरा अभिमान ..... मुलीचा अभिमान असावा असेच संस्कार तिला दिले जातात याचे खुप कौतुक आहे. परंतु अभीमान  बाळगण्यासाठी "बेटी "हा शब्द अधोरेखीत करत आपणच आपल्या मुलींना जाणीव करून देतो की कोने एके काळी ती पीडित होती.  मुलगा असो की मुलगी पालक म्हणून " मेरे बच्चे मेरा अभिमान .... असे म्हणून बघा याने हळू हळू लिंगभेदाची तीव्रता कमी होत समानतेचा अंकुर बालमनात नक्कीच रुजेल .

मुलगी लक्ष्मी आहे तर मुलगा नारायण आहे .... 

जोडी बनल्यावर ती लक्ष्मी नारायणाचीच शोभून दिसते. तेव्हा जे आहे त्याचा अभिमान तर बाळगाच पण जे नाही त्याचा न्यूनगंड बाळगू नका आणि तो इतरांनाही देवू नका.

          घरकाम, शालेय शिक्षण शिकवत असताना मुलागा मुलगी हे भेद नष्ट करुन काळाची गरज लक्षात घेता दोघानाही त्याचे योग्य प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न व्हायला हवा.

    समाजातील कोणत्याही  एका घटकाला केवल लिंग भेदाचा आधार घेत  महत्त्व न देता.... समानतेच्या दृष्टीने कृती करायला हवी.

समाज हा माणसाला घोड्यावर बसू देत नाही... घोड्यासोबत पायी चालू देत नाही की घोड्याला डोक्यावर हि घेवू देत नाही ... तेव्हा आपण कसं वागायचं हा सर्वस्वी आपला निर्णय असावा.

आपली छोटीशी कृती ही भविष्यातल्या अनेक मोठ्या बदलांची नांदी असते हे लक्षात असू द्या. कोणतीही कृती केवळ अनुकरणाने न करता त्याचा सखोल विचार करूनच स्वीकारायला हवी. लिंगभेद नष्ट करुन समानता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकायला हवे.

©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगीरे)

टिपः लेख आवडला तर नावासहित शेयर करायला हरकत नाही. साहित्य चोरी कायद्याने गुन्हा आहे.

 खरं तर मी ज्या विषयावर लिहिले आहे.... तो विषय अती संवेदनशील असून सगळ्यांच्या डोक्यात असतो.

मला वाटलं की कळत नकळत आपण त्यावर व्यक्त होण्याचे टाळतो किंवा चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतो म्हणूनच मी माझ्या परीने केलेले विचारमंथन  इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. समाजात मिसळत असताना अनेक अनुभव आले ... त्यातून मी जे शिकले ते इथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे अनुभव वेगळे असतील त्यावर आधारित तुमची मते किंवा प्रतिक्रिया वेगळ्या असतील त्यांचाही आदर आहे.मला काय म्हणायचे आहे हे कोणताही पूर्व ग्रह न ठेवता वाचले तर नक्की पटेल....  

सोप्या सुंदर रांगोळ्यांसाठी Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे YouTube Channel subscribe करा. 

तसेच रंग माझा वेगळा या face book  पेज लाही follow करा 
ईतर लिखाण आणि रांगोळ्या आशयघन रांगोळी या ब्लॉग वर उपलब्ध आहे 




दिवाळी बलिप्रतिपदा २०२०

 दिवाळी बलिप्रतिपदा निमित्त २०२० काढलेली ही रांगोळी

        बलिप्रतिपदा ही बळीराजाची उत्सव म्हणुन साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी सिंधू संस्कृतीतील बैलाचे चित्र रांगोळीत रेखाटून धान्याच्या राशीने ही रांगोळी सजविण्याची पद्धत आहे.

या दिवशी थोडे धान्य एकमेकांना दिले जावे  आणि ते देताना " इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो" असे म्हणावे अशी प्रथा आहे.

त्याला अनुसरून काढलेली माझी ही रांगोळी आहे.

या रांगोळीला "सत्यशोधक प्रबोधन महासभा" यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे.

याच स्पर्धेत माझ्या मुलाने ही सहभाग नोंदवला होता. त्याच्या रांगोळीला  विशेष उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले आहे.

©️ अंजली मीनानाथ धस्के 

माझी रांगोळी: प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले


 
मुलाची रांगोळी: विशेष उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले