अरुणा शानबाग यांना भावपुर्ण श्रद्धांजली


परिचारिके च व्रत घेणाऱ्या अरुणा  शानबाग या आज आपल्यात नाहीत . माणसाच्या दुष्ट प्रवृत्तीला  बळी पडून आयुष्याची ४२ वर्षे काळोखात , असह्य वेदनेत त्यांनी घालवलीत. "एका वेदनेची अखेर " संपूर्ण समाजाला चटका लावून गेली.  त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झालेली असली तरी आपण आपल्या मनात अन्याया विरुद्ध लढण्याची ठिणगी पेटती ठेवली पाहिजे.  झालेल्या घटनांना आपण बदलू शकत नही , तरी अश्या  वाईट घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता नक्कीच घेऊ शकतो.   अरुणा शानबाग यांना माझी  भावपुर्ण श्रद्धांजली …………

                                                   [१८/५/१५ ]

No comments:

Post a Comment